farmers

ऊसाची भरपाई छातीवर बसून काढून घेऊ - राजू शेट्टी

यावर्षी ऊसाला पहिली उचल ३ हजार रुपये विनाकपात मिळाली पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलीय. अन्यथा छातीवर बसून भरवाई घेऊ, असा इशारा देत शेतकरी संघटनेनं यासाठी राज्य सरकारला १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिलीय. मागणी मान्य न झाल्यास १५ नोव्हेंबरपासून कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आंदोलनाचा इशारला शेट्टी यांनी दिलाय.

Nov 8, 2013, 10:49 PM IST

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी `काळी दिवाळी`?

देशात दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आलीय.

Oct 30, 2013, 06:33 PM IST

निर्यातबंदी लादल्यास अफू, गांजा आणि भांगेची लागवड!

राज्यात कापसाचं सर्वाधिक उत्पादन खान्देशात होतं.. यंदा खान्देशात कापसाला चांगला दर मिळालाय. मात्र हा दर कायम राहणार का पुन्हा शेतक-यांच्या पदरी निराशा येणार अशी काळजी बळीराजाला सतावतेय...

Oct 15, 2013, 09:24 AM IST

पावसाळा संपत आला तरी मराठवाडा तहानलेलाच

पावसाळा सरत आलाय मात्र मराठवाड्याची तहान अजूनही भागलेली नाहीये.. राज्यातील सर्वच भागातील धरणं ओसंडून वाहताय.. मात्र मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी अजूनही तहानलेले आहे..

Sep 30, 2013, 06:28 PM IST

काँग्रेसचा गड काबीज करण्यासाठी राष्ट्रवादीची फिल्डींग

काँग्रेसचे नेते पी. के. पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे काँग्रेसचा गड असलेला नंदुरबार जिल्हा काबीज करण्याकडे राष्ट्रवादीनं आगेकूच केली. खुद्द राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यानं बिगर आदिवासींचं ध्रुवीकरण करण्यात राष्ट्रवादीला यश आलं.

Sep 18, 2013, 12:28 PM IST

१०१ महिलांनी मोदींना लिहिली रक्ताने पत्रं!

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना १०१ महिलांनी रक्ताने पत्रं लिहून पाठवली आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी हा पत्रप्रपंच करण्यात आला आहे.

Jul 8, 2013, 08:16 PM IST

‘एनटीपीसी’ची दादागिरी चालणार नाही!

सोलापुरातल्या होटगी परिसरात ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारित असणाऱ्या एनटीपीसी प्रकल्पाचं बांधकाम अवैध असून या बांधकामाला ग्रामपंचायतीनं हरकत घेतलीय.

Jun 4, 2013, 07:42 PM IST

भ्रष्टाचाराविरोधात शेतकऱ्यांनीच थोपटले दंड!

ज्या भागात भौगोलिक परिस्थितीमुळे सिंचन प्रकल्प राबवण्यात अडचणी आहेत त्या भागात पर्यायी योजना राबवून सिंचनक्षेत्र आणि पर्यायाने शेतीविकास करण्याची शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे.

May 28, 2013, 05:24 PM IST

‘पाऊस पडू द्या, मग पेरणीचं पाहू`

दुष्काळामुळं पाण्याचे दुर्भिक्ष आणि पावसाच्य़ा बेभरवशीपणामुळं यंदा खानदेशातल्य़ा कापूस पट्ट्यात मान्सूनपूर्व पेरण्याच झालेल्या नाहीत.

May 21, 2013, 09:18 AM IST

हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्याला शेतकऱ्यांचा विरोध

सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सोलापुरातल्या साखर कारखान्याला, मोहोळ तालुक्यातल्या 20 गावातल्या शेतक-यांनी विरोध केलाय.

May 14, 2013, 10:08 PM IST

कर्जमाफीचा घोटाळा

केंद्र सरकारच्या कर्जमाफी पाठोपाठ राज्य सरकारनंही आपली कर्जमाफी जाहीर केली होती.. आणि गंमत म्हणजे, केंद्र सरकारच्या कर्जमाफी घोटाळ्यानंतर आता राज्य सरकारच्या कर्जमाफीतही घोटाळा समोर आलाय..

Mar 18, 2013, 11:30 PM IST

राज्य सरकारच्या कर्जमाफीतही घोटाळा!

केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतही मोठा घोटाळा झाल्याचं झी 24 तासनं उघड केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यात केवळ एका संस्थेत 52 लाखांच्या कर्जमाफीत तब्बल 42 लाख रुपये अपात्र लाभधारकांनी लाटल्याचं पुढं आलंय.

Mar 18, 2013, 06:13 PM IST

ऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती

अहमदनगर तालुक्यातील गर्भगिरी परिसरात उभारलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनी इनरकॉन इंडिया कंपनीने शेतक-यांच्या इच्छा नसतानाही खरेदी केल्या. तसंच जे शेतकरी या कंपनीला विरोध करतात त्या शेतक-यांना कंपनीचे गुंड मारहाण करत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.

Mar 10, 2013, 07:11 PM IST

`कॅग` रिपोर्टची घेतली रिझर्व्ह बँकेने दखल

कर्जमाफी प्रकरणी कॅगचा रिपोर्ट संसदेत सादर झाल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं याची गंभीर दखल घेतली आहे. कर्जमाफी प्रकरणी आरबीआयनं देशातील बँकांच्या अध्यक्षांना एक पत्र पाठवलं आहे.

Mar 7, 2013, 08:04 PM IST

अर्थसंकल्प : कृषी विकासासाठी काय मिळाले?

यंदाच्या बजेटमध्ये शेती विकासाठी भरीव तरतूद करण्यात आलीय. देशातील कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यासाठी ३ हजार ४१५ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. आज केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी २०१३-२०१४चा अर्थसंकल्प सादर केला.

Feb 28, 2013, 04:09 PM IST