मराठी पाइम टाइमसाठी मनसेचा पुन्हा एल्गार, गुजराती चित्रपटाला विरोध
मराठी चित्रपटासाठी मनसेनं पुन्हा एकदा एल्गार केलाय. प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट डावलून गुजराती आणि इतर प्रादेशिक चित्रपट दाखवायला मनसेनं विरोध दर्शवलाय. गेल्या आठवड्यात मनसे कार्यकर्त्यांनी बोरिवलीतील सोना गोल्ड सिनेमा थिएटरबाहेर निदर्शने करत 'गुज्जूभाई दि ग्रेट' या चित्रपटाच्या शोबाबत आक्षेप घेतला. मनसेच्या या भूमिकेवरून आता मराठी विरुद्ध गुजराती वाद चिघळण्याची शक्यता आहे.
Oct 5, 2015, 12:14 PM ISTशेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे या... नाहीतर...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बॉलिवूडला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलंय. मनसेनं बॉलिवूडला धमकीच दिलीय, जर ते पुढे आले नाही तर त्यांच्या चित्रपटांवर बंदी घातली जाईल.
Sep 9, 2015, 12:10 PM ISTपत्नीवरील हल्ल्यानंतर राज ठाकरेंनी पाळीव कुत्र्यांची रवानगी केली फार्म हाऊसवर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या घरातील सर्व कुत्र्यांची आपल्या कर्जतच्या फार्म हाऊसवर रवानगी केलीय. काल राज ठाकरेंकडील बॉण्ड या कुत्र्यानं पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या चेहऱ्याला चावा घेतला. यात शर्मिला ठाकरे जखमी झाल्या आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
Aug 20, 2015, 11:44 AM ISTमनसेची बहुप्रतिक्षित ‘ब्ल्यू प्रिंट’ सादर!
एकीकडे आघाडी आणि महायुतीच्या घटस्फोटाची घोषणा करत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली बहुप्रतिक्षित ‘ब्ल्यू प्रिंट’ सादर केली. सगळेच पक्ष केवळ आपापला विचार करत असताना आपण तरी महाराष्ट्राचा विचार करुयात, असं म्हणत राज यांनी तब्बल दोन तास राज्याच्या सर्वांगिण विकासाचा आराखडा मांडला.
Sep 26, 2014, 09:38 AM ISTनाशकातील मनसे-भाजप युती संपुष्टात, उद्धव खूश
नाशिक महापालिकेतली मनसे-भाजपचा अडीच वर्षांचा संसार अखेर संपुष्टात आलाय. शिवसेनेचा महापौर निवडून आणण्यासाठी भाजपनं पुन्हा शिवसेनेसोबत घरोबा करायचं ठरवलंय. त्यामुळं महापौर निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंच्या मनसेची मोठी कोंडी झालीय. इतके दिवस नाशिककर संभ्रमात होते, पण आता त्यांनाही चांगलं प्रशासन मिळणार आहे, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केलाय.
Sep 10, 2014, 08:27 AM ISTमहायुतीत बिब्बा घालणाऱ्यांचा भाजपनं बंदोबस्त करावा- उद्धव
`महायुती अभेद्य असून भाजप अन्य कोणत्याही मार्गानं जाणार नसल्याचं नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांनी शिवसेनेला आश्वस्त केलंय. त्यामुळं इतरांनी त्यावर बोलण्याची गरज नाही,` असं सांगत, `महायुतीत बिब्बा घालणाऱ्यांचा बंदोबस्त भाजपनं करावा,` असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठणकावलंय.
Mar 13, 2014, 03:36 PM ISTकमळाबाईंसाठी सेनेचं `टेंगूळ आख्यान`, गडकरींवर टीकास्त्र
सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपवर टीका केलीय. `टेंगूळ आख्यान` या मथळ्याखाली आलेल्या अग्रलेखात भाजप-मनसे जवळीकीवर टीकास्त्र सोडलंय. दुश्मनांचे डोके फोडण्याऐवजी भाजप सध्या स्वतःच्या डोक्यात काठी मारुन टेंगूळ आणत असल्याची टीका यात करण्यात आलीय.
Mar 13, 2014, 11:43 AM IST‘विक्रांत’ बचावासाठी शिवसेना, मनसेसोबत बाप्पाही आले!
ऐतिहासिक महत्त्व असलेली आयएनएस विक्रांत ही युद्धानौका वाचवण्यासाठी आता गणेश मंडळांनीही पुढाकार घेतलाय. मुंबईमध्ये १० हजारांहून जास्त सार्वजनिक गणेश मंडळं आहेत. या मंडळानी प्रत्येकी १० हजार किंवा स्वेच्छेने त्याहून अधिक निधी दिला तर १० ते १५ कोटी जमा होतील, अशी माहिती गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्षा नरेश दहिबावकर यांनी दिलीय.
Dec 13, 2013, 09:05 PM ISTवृद्ध कर्मचाऱ्याला मारहाणः मनसे नगरसेवकाला अटक
ठेकेदाराच्या वृद्ध कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी कल्याण- डोंबिवलीचे मनसे नगरसेवक नितीन निकम यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, निकम यांना कोर्टाने जामीनही दिला आहे.
Dec 3, 2012, 05:31 PM ISTमनसेचा पुण्यात विरोधकाचा दावा
पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावर मनसेनं दावा सांगितला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप-आरपीआय गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीला मनसे दे धक्का देणार का, याची उत्सुकता आहे.
Feb 23, 2012, 11:05 AM ISTमनसेला आडकाठी, आठवले-भुजबळांच्या भेटीगाठी
नाशिक महापालिकेच्या सत्तासमीकरणांत नवे रंग भरलेत. भुजबळांनी आठवलेंना महापौरपदाची ऑफर दिली. शिवसेना-भाजप युतीचा पाठिंबा मिळाला तर तीन पक्षांच्या पाठिंब्यानं नाशिकमध्ये आठवलेंचा महापौर होऊ शकतो.
Feb 22, 2012, 10:06 PM IST'मनसे'चा झंझावात
यावेळेला ना कुठला प्रखर मुद्दा होता ना कुठलं खळ्ळ फटॅक! तरी पण प्रत्येक शहरात केवळ एकच सभा घेऊनही केवळ राज ठाकरे या नावावर मनसेला दिमाखदार असं यश लाभलं. मत विभाजन करणारा पक्ष अशी टीका करणाऱ्यांनाच आता मत खेचणारा पक्ष अस म्हणावं लागत आहे.
Feb 22, 2012, 09:47 PM ISTराज ठाकरेंचा परत एकदा शिवसेनेवर हल्लाबोल
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. मनाने हरल्यानेच शिवसेना फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचं सांगत त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. माणूस आतून लढाई हरला की, भलतेसलते उद्योग करायला लागतो.
Jan 23, 2012, 09:04 AM IST