राज्याचे काँग्रेस प्रचारप्रमुख राणेंचा मोदी सरकारवर 'प्रहार'!
यूपीएची सत्ता असताना परकीय गुंतवणूकीला विरोध दर्शवणाऱ्या 'स्वदेशी' समर्थक भाजपनं सत्तेवर येताच संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस मंजूरी दिली, असं निदर्शनास आणून देत भाजप हा रंग बदलणारा पक्ष असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रचारप्रमुख आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. 'अच्छे दिन येणार' असं सांगणाऱ्यांनी महागाईवरुन जनतेचा भ्रमनिरास केला असा टोलाही नारायण राणेंनी मोदी सरकारला लगावला आहे.
Aug 22, 2014, 06:18 PM IST'आत्महत्येचा प्रयत्न' गुन्हा राहणार नाही?
‘आत्महत्येचा प्रयत्न’ गुन्ह्याच्या चौकटीतून बाहेर काढून टाकण्याची तयारी सरकारनं केलीय. यासाठी कलम 309 काढून टाकण्यात येऊ शकतो.
Aug 6, 2014, 11:33 AM ISTमोदी सरकारविरोधात राजू शेट्टींचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 08:28 PM ISTमोदी सरकारविरोधात राजू शेट्टींचा इशारा
रेल्वे दरवाढीनंतर आता शेतमालाच्या दरावरून मोदी सरकारला शेतक-यांच्या रोषाचा सामना करावा लागण्याची चिन्ह आहेत. केंद्र सरकारनं शेतमालाच्या ठरवलेल्या किमान आधारभूत किंमतींना दुसरं तिसरं कुणी नव्हे एनडीएचा घटक पक्ष असलेल्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेनंच आक्षेप घेतलाय. एवढंच नव्हे तर आधारभूत किंमत वाढवून दिल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी मोदी सरकारला दिलाय.
Jun 27, 2014, 07:30 PM ISTशेतकऱ्यांनो पेरण्या करु नका, केंद्र सरकारची बैठक
जून बरोबरोबरच जुलै महिना देखील पावसासाठी फारसा समाधानकारक नसल्याचा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलाय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला डॉ. साबळे यांनी दिलाय. त्याचप्रमाणे पावसाचा कमी झालेला कालावधी लक्षात घेऊन पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज डॉ. साबळे यांनी व्यक्त केलीय.
Jun 26, 2014, 07:21 PM ISTपाहा मोदींच्या कॅबिनेटमध्ये कुणाला, कोणतं खातं मिळालं?
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलं आहे.
May 27, 2014, 11:12 AM ISTमहिलांना सलग ७३० दिवस विनाखंड सुट्टीचा हक्क!
कोणतीही केंद्रीय सरकारी नोकरदार महिला आपल्या सेवाकाळात आपल्या मुलांच्या संगोपणासाठी, मग ते परिक्षेसाठी असो किंवा आजारपणासाठी... सलग दोन वर्षांची सुट्टी घेऊ शकते, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय.
Apr 16, 2014, 12:10 PM ISTकेंद्र सरकारची महागाई भत्त्यात वाढ
लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याचे ठरवले आहे. महागाई भत्त्यात १० टक्कांची वाढ होणार आहे.
Feb 28, 2014, 05:06 PM ISTलोकपाल विधेयक मंजुरीनंतर अण्णांचा केजरीवालांना चिमटा
लोकपाल विधेयक लोकसभेत मंजूर होताच नऊ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अण्णांनी सोडलं. शाळेतल्या विद्यार्थिनीच्या हातून अण्णांनी ज्यूस घेतलं. त्यानंतर अण्णांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या राळेगणवासियांनी जल्लोष केला. या जल्लेषात स्वत: अण्णाही सहभागी झाले.
Dec 18, 2013, 06:35 PM ISTलोकपाल विधेयक राज्यसभेत, विधेयक मंजूर होणार?
लोकपाल विधेयक मंजुरीसाठी सरकार आज राज्यसभेत मांडण्याची शक्यता आहे. लोकपाल विधेयक शुक्रवारी म्हणजे आज चर्चेला आणवं अशी मागणी केलीय. दरम्यान, भाजपने विरोध केलाय तर राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे.
Dec 13, 2013, 07:47 AM ISTशरद पवारांचे नवे राजकीय भाकित, सरकार सहा महिनेच
२०१४चं चित्र विस्कळीत असेल. २०१४ ला निवडून आलेलं सरकार वर्ष सहामहिनेच टिकेल. वर्षभरात पुन्हा निवडणुकांची शत्यता असेल, असं भाकित केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. युपीए तीनबाबतही त्यांनी साशंकता व्यक्त केली आहे.
Dec 12, 2013, 12:05 PM ISTकेंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये नोकरीची संधी
चला मित्रांनो सरकारी नोकरीची संधी आहे... तुमचं शिक्षण कमी झालंय म्हणून घाबरून जावू नका... केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये, विभागांमध्ये आणि कार्यालयांमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ म्हणजेच नॉन टेक्निकल भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
Nov 21, 2013, 10:48 AM IST‘आधार’ला आधारासाठी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात!
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आधार कार्ड सक्तीचे नाही आणि कोणत्याही नागरिकाला आधार कार्ड नसल्यामुळे सरकारी सुविधा नाकारता येणार नाहीत, या निर्णयात सुधारणा करण्यासाठी शुक्रवारी केंद्र सरकारने याचिका दाखल केली.
Oct 4, 2013, 07:37 PM IST`आधार`ला कायदेशीर दर्जा देण्यावर भर
सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्डबाबत केंद्र सरकारला दणका दिल्यानंतर आता `आधार`ला कायदेशीर दर्जा देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
Sep 25, 2013, 02:23 PM ISTकेंद्रातील काँग्रेस सरकारची नोकर भरतीवर टाच
केंद्र सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आल्याने केंद्राने थेट नोकर भरतीवर टाच आणली आहे. त्यामुळे वाढती बेरोजगारी हे आता अधिक चिंतेचा विषय झाली आहे.
Sep 19, 2013, 09:34 AM IST