उल्हासनगर येथे चारित्र्याच्या संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने आपल्या पत्नीचा खून केला. त्यानंतर त्याने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घटनास्थळी तात्काळ पोलीस पोहोचल्याने पतीला वाचविण्यात यश आले.

Updated: Sep 18, 2015, 08:58 AM IST
उल्हासनगर येथे चारित्र्याच्या संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून title=

उल्हासनगर : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने आपल्या पत्नीचा खून केला. त्यानंतर त्याने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घटनास्थळी तात्काळ पोलीस पोहोचल्याने पतीला वाचविण्यात यश आले.

ही घटना बुधवारी रात्री जोशी  चाळ, माणेरेगाव, उल्हासनगर येथे  घडली. चारित्र्यावर संशय घेऊन आपले कुटुंब उध्वस्त केल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पत्नीचा खून केल्याच्या आरोपाखाली विठ्ठलवाडी पोलिसांनी पती विशाल पांडुरग टपाल(३८) याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय. दरम्यान, विशाल ७० टक्के भाजल्याने त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

विशाल पत्नी आशा (२५) हिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्याने रागाच्या भरात तिला लाकडी दंडुक्याने मारहाण केली. त्यात ती जागीच मृत्यू पावली. पत्नीची हत्या आपल्या हातून झाल्याचे लक्षात येताच त्यांने रॉकेल अंगावर ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

विशालला वाचविण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान पोलिसांनी मृत पत्नी आशाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.