हे वागणं सेक्युलर नव्हे !, औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावरुन शिवसेनेचा काँग्रेसला टोला

 औरंगाबादच्या कोणत्या खुणा महाराष्ट्रात ठेवू नये ही शिवसेनेची भूमिका

Updated: Jan 17, 2021, 11:24 AM IST
हे वागणं सेक्युलर नव्हे !, औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावरुन शिवसेनेचा काँग्रेसला टोला  title=

मुंबई : औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावरुन(Aurangabad renaming Issue) शिवसेनेनं (Shiv sena) काँग्रेसला (Congress) टोला लगावलाय. सामनाच्या अग्रलेखातून नामांतराच्या भूमिकेचं पुन्हा एकदा समर्थन केलंय. औरंगबादचे नाव बदलल्यास अल्पसंख्यांक म्हणजे मुस्लीम समाज नाराज होईल अशी भीती कॉंग्रेसला वाटतेय. यासाठी कॉंग्रेससारखे 'सेक्युलर' पक्षाचा संभाजीनगर (Sambhajinagar) नावास विरोध आहे. पण औरंगाबादच्या कोणत्या खुणा महाराष्ट्रात ठेवू नये असे सामनातून म्हटलंय. 

औरंगजेब सेक्यूलर अजिबात नव्हता. त्याचा संबंध संभाजीराजांच्या वधाशी जोडला गेला. औरंगजेबाच्या आदेशावरुनच संभाजीराजांना हालहाल करुन मारण्यात आले आणि त्यांचा छन्नाविच्छिन्न देह बेवारस अवस्थेत फेकून देण्यात आल्याचा दाखला सामनातून देण्यात आलाय. राज्यातील सर्वच पुढाऱ्यांनी संभाजी राजांचा इतिहास पुन्हा वाचायला हवा. असा औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर हे वागणं सेक्युलर नव्हे असा टोला सामनातून कॉंग्रेसला लगावण्यात आलाय.  

महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी संभाजी महाराजांवरच प्रेम करावे अशी माझी भूमिका आहे, मी काँग्रेसवर हल्ला केलेला नाही असे स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलंय. 

औरंगजेब हा क्रूर शासक होता, त्याला इतर धर्माविषयी प्रेम नव्हते, अश्या राजाच्या नावाविषयी महाराष्ट्रात काय देशात देखील कोणी आग्रही असू नये, ही शिवसेनेची भूमिका असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे संभाजी नगर हे नाव आम्ही दिले असून त्यावर आक्षेप असू नये. यात मुस्लिम किंवा हिंदू व्होट बँकेच्या प्रश्न येत नाही. याच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अस्मितेचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जरी असले तरी त्यांच्याइतका सेक्युलर राजा या जगात झाला नाही, तसेच छत्रपती संभाजी राजे देखील आहेत असे राऊतांनी म्हटले.