राजा-महाराज हिवाळ्यात काय खायचे? शाकाहारी की मांसाहारी.. जाणून घ्या काय आवडचं?

Raja Maharajas Winter Food : पुन्हा एकदा प्रत्येकजण आपल्या आहार आणि आरोग्याबाबत सतर्क झाले आहेत. जुना आहार नव्याने डाएट फूडमध्ये सहभागी होत आहे. अशावेळी आपले राजे-महाराजे थंडीत काय आहार घेत होते, जाणून घ्या? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 23, 2023, 05:50 PM IST
राजा-महाराज हिवाळ्यात काय खायचे? शाकाहारी की मांसाहारी.. जाणून घ्या काय आवडचं?  title=

हिवाळा हा खाद्यपदार्थाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा महिना मानला जातो. थंडीपासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या भागात लाडूंसह असे अनेक पदार्थ तयार केले जातात, ज्यामुळे आरोग्य तर चांगले राहतेच शिवाय थंडीपासून संरक्षण होते आणि ताकद मिळते. थंडीमध्ये आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. श्रीमंतांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांच्या खाण्याच्या सवयी हिवाळ्यात बदलतात. महत्त्वाच म्हणजे हे आजपासून नाही तर प्राचीन काळापासून होत आहे. अशा परिस्थितीत राजा-महाराजांनी हिवाळ्यात कोणते विशेष अन्न किंवा पदार्थ खाल्ले ते जाणून घेऊया. 

इतिहासकारांनी दिलेल्या माहितीनुसार, राजे-सम्राटही आरोग्यासाठी चांगले मानले जाणारे पदार्थांचा आहारात समावेश करत. फरक एवढाच की, गुणवत्तेत कोणतीही तडजोड नव्हती. ते सर्वोत्तम होते. इतर गोष्टींप्रमाणेच त्यांचे जेवणही चैनीचे होते. प्रत्येकाच्या आवडीनिवडी सारख्याच होत्या असे नाही, पण हिवाळ्याच्या मोसमात त्यांचे खाद्यपदार्थ पूर्णपणे परिसराशी संबंधित होते. पूर्वी साधनसामग्री कमी होती त्यामुळे वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी बराच वेळ लागत असे. त्यामुळे स्थानिक गोष्टींचाच वापर करण्यावर भर दिला जात होता. अशावेळी जे पिकायचं त्याच आहाराकडे भर दिला जातो. 

बाजरीच्या खिचडीवर अधिक भर

शेखावती येथील इतिहासकार महावीर पुरोहित सांगतात की, हिवाळ्याच्या काळात राजा महाराजांनी खास शाकाहारी पाककृतीतून बनवलेल्या गोंड आणि मेथीच्या लाडूंसोबत बाजरीपासून बनवलेल्या खिचडीवरही विशेष भर दिला. त्याचा प्रभाव गरम आहे. त्यामुळे थंड वातावरणात शरीराला आतून उष्णता मिळावी यासाठी बाजरीचा वापर करत. बाजरी राजस्थानमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. त्यासाठी बाजरीच्या बिया पाण्यात भिजवल्या. या खिचडीमध्ये शुद्ध पिवळे गाईचे तूप घालण्यात आले. शाही स्वयंपाकघरातील आचारी ही खिचडी खास पद्धतीने बनवत असत.

हिवाळ्यात केशर मिसळून गरम दूधृ

बहुतेक राजे-महाराजांबद्दल असे म्हटले जाते की, ते हिवाळ्यात केशर मिसळलेले गरम दूध प्यायचे. केशर शक्तिवर्धक आहे. हिवाळ्यात, मांसाहारी लोकांमध्ये, तीतर, हरीण आणि रानडुकरांच्या मांसाला प्राधान्य दिले जाते. त्यांचा स्वभावही उष्ण असतो. आज तितर आणि हरणांच्या शिकारीवर बंदी असली तरी पूर्वी तशी नव्हती. राजाचा आदेश सर्वस्व होता. त्यामुळे त्यांची कमतरता नव्हती. त्यांची शिकार करण्याची जबाबदारी एका विशिष्ट जातीकडे देण्यात आली होती.

स्थानिक पदार्थांचा समावेश

इतिहासाचे निवृत्त प्राध्यापक कमल कोठारी सांगतात की, जर आपण इतिहासावर नजर टाकली तर ब्रिटिश राजवटीपूर्वी आणि नंतर राज महाराजांच्या खाण्याच्या सवयी आणि खाण्याच्या पद्धतीत खूप बदल झाला होता. पूर्वी ती पूर्णपणे देसी होती, नंतर इंग्रजी संस्कृती त्यात प्रबळ झाली. हिवाळा असो किंवा उन्हाळा, त्यांचे अन्न स्थानिक उत्पादनांच्या उपलब्धतेवर आधारित होते. राजस्थानमध्ये हिवाळ्यात सामान्य माणूस असो वा राजा असो, बाजरीच्या खिचड्याला नेहमीच प्राधान्य असते. अगदी संस्थानांमध्ये हिवाळ्यातील सामान्य खाद्यपदार्थांसोबत खिचरा आणि दाली बाटी यांनाही प्राधान्य होते. बिकानेर रिसायतच्या स्थापनेच्या दिवशी त्या भागातील प्रत्येक घरात खिचडा तयार केला जातो.

बाजरीची खिचडा, कढी, गूळ आणि शुद्ध देशी तूप

इतिहासावर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या बिकानेरच्या शिक्षणतज्ज्ञ जानकी नारायण श्रीमाळी सांगतात की, राजे राजवाडाही बाजरीपासून बनवलेल्या आरोग्यदायी पदार्थांवर गरम चवीनं भर देत असत. यामध्ये बाजरी, खिचडा, कढी, गूळ आणि शुद्ध देशी तूप यासोबत दुधात केशर वापरण्यात आले. या यादीत मूगाचाही समावेश आहे. बाजरी हा राजस्थानचा मुख्य खाद्यपदार्थ आहे. पौष्टिक असण्यासोबतच आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही ते खूप फायदेशीर आहे. फरक एवढाच की, संस्थानांमध्ये त्यांचे स्वयंपाकी उत्कृष्ट पदार्थ बनवत असत तर सामान्य लोक ते साध्या पद्धतीने खातात.