मराठीत पहिल्यांदाच; 'तुला जपणार आहे' मालिकेच्या प्रेस लाँचला होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर

Tula Japnar Aahe Marathi Serial : 'तुला जपणार आहे' या मालिकेतून पहिल्यांदाच मराठी मालिकांमध्ये वापरण्यात आला होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर 

दिक्षा पाटील | Updated: Feb 15, 2025, 03:11 PM IST
मराठीत पहिल्यांदाच; 'तुला जपणार आहे' मालिकेच्या प्रेस लाँचला होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर  title=
(Photo Credit : Social Media)

Tula Japnar Aahe Marathi Serial : झी मराठीने मराठी मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा नवा बेंचमार्क प्रस्थापित केला आहे. ‘तुला जपणार आहे’ मालिकेच्या प्रेस लाँचच्या निमित्तानं, झी मराठीनं उपस्थित पत्रकारांसोबत एका रोमांचक कथाकथनाचा अनुभव घेण्यासाठी अत्याधुनिक होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर केला. हा लॉन्च कार्यक्रम खरोखरच उपस्थितांसाठी वेगळा ठरला.  

'तुला जपणार आहे'  या मालिकेतून झी मराठीवर शर्वरी लोहोकरे पुन्हा एकदा कमबॅक करणार आहेत. तसेच या मालिकेत नीरज गोस्वामी , प्रतीक्षा शिवणकर , मिलिंद फाटक, पूर्णिमा तळवलकर, निलेश रानडे, मनोज कोल्हटकर, अमोल बावडेकर या तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. 'तुला जपणार आहे' ही कथा आहे. एका आईची! अंबिकाची, जिने आपल्या मुलीच्या संरक्षणाचं व्रत घेतलय. आत्मारुपात ती तिच्या आजूबाजूला असणार आहे परंतु आत्मारुपात तिला तिच्या जाण्यानंतर दिसतात ते घरातले बदललेले फासे व तिच्या मुलीच्या जीवावर उठलेले लोक, तिच्या जाण्यानंतर मुलगी आणि वडिलांमध्ये झालेली ताटातूट या सगळ्याचा पाठलाग करत अंबिकाच्या प्रार्थनांना प्रतिसाद देत देवीनं तिच्या मुलीच्या संरक्षणासाठी मीराला पाठवलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

हेही वाचा : 'चित्रपटाची शेवटची 40 मिनिटं...', 'छावा' पाहिल्यानंतर कतरिनाची विकीसाठी खास पोस्ट; कौशल कुटुंबाचा VIDEO व्हायरल

मीरा जिची देवीवर नाराजी आहे, जिचा देवीवर विश्वास नाही. अशी मीरा आत्मारूपी अंबिकाला पाहू शकते, तिला स्पर्श करू शकते. तसंच अंबिका तिच्यासोबत देवळाच्या पायऱ्याही चढू शकते. या दोघींच्या या नात्यामागचं गूढ असेल तरी काय? अंबिकाच्या मदतीला धावून आलेली मीरा कशी तिच्या मुलीच्या आयुष्यात येणार हे पाहण्यासारखे असेल. तुला जपणार आहे या हॉरर, थ्रिलर आणि फॅमेली ड्रामा असणाऱ्या या मालिकेतील प्रसंग आणि घटना Larger Than Life असणार आहेत. तसंच या मालिकेचं आकर्षण आहे ते म्हणजे VFX. या मालिकेतील VFX बघण्या आणि अनुभवण्यासारखे असणार आहेत. अविस्मरणीय कथानकासोबतच डोळे दिपवणारी अशी ही भव्य मालिका असणार आहे. चेतन सैंदाणे यानं या मालिकेचं पटकथा लेखन केलं आहे आणि याचे संवाद लिहिले आहेत. पूर्णानंद वांढेकर हे तर मालिकेचे निर्माते आहेत आयरिस प्रोडक्शन्सचे विद्याधर पाठारे. मालिकेचे  दिग्दर्शक आहे जयंत पवार.