राज ठाकरे म्हणतात, अण्णा लक्ष द्या
अण्णा हजारे यांचे आंदोलन भ्रष्ट्राचारा विरोधात आहे, याला आमचा पाठिंबा आहे. मात्र, अण्णांनी प्रथम महाराष्ट्रात लक्ष देण्याची गजर आहे. अण्णा हे चांगले व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत कोणाचे दुमत असण्याची गजर नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले.
Apr 26, 2012, 03:25 PM ISTराज ठाकरेंची मिश्कील फटकेबाजी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या परखड बोलण्यासाठी जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढेच त्यांच्या मिश्कील बोलण्यासाठीही प्रसिद्ध आहेत... पुण्यात आज त्यांच्या मिश्कील बोलण्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. निमित्त होतं चिंटू या चित्रपटाच्या म्युझिक लाँचचं.
Apr 25, 2012, 11:19 PM IST'चिंटू'चं म्युझिक लाँच दिमाखात
'चिंटू' हा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चित्रपटाबरोबरच त्याचं संगीत काय असेल याचीही उत्सुकता अखेर संपली.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या चित्रपटाचं पुण्यात म्युझिक लाँच करण्यात आलं
Apr 25, 2012, 10:48 PM ISTराज ठाकरे फितुरांवर कारवाई करणार!
मुंबई महापालिकेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्याची शक्यता असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला केवळ २८ जागांवर यश मिळविता आले. यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच नाराज असून त्यांनी वेळोवेळी दगा-फटका करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करणार असल्याचे संकेत दिले होते.
Apr 22, 2012, 08:24 AM ISTराज ठाकरेंची याचिका हायकोर्टाने फेटाळली
शिवाजी पार्कवर फूट फेस्टिव्हल आयोजित करण्यास परवानगी मिळावी या मागणीची मनसेची याचिका मुंबई हायकोर्टाने आज फेटाळली.
Apr 19, 2012, 04:49 PM ISTराज ठाकरे यांच्या भेटीला सुभाष घई....
सिने दिग्दर्शक सुभाष घई हे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले आहेत. व्हिसलिंग वुडसप्रकरणी सुभाष घई अडचणीत आले आहेत. त्यासाठीच सुभाष घई राज यांच्या भेटीला पोहोचल्याचं समजतं आहे.
Apr 17, 2012, 02:45 PM IST'सामना'ने राजची उडवली रेवडी, वड्याची झाली रबडी'
बिहार दिनावरुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. खमंग वड्याची रबडी झाली या शब्दांत शिवसेनेचं मुखपत्र सामनातून बाळासाहेबांनी मनसे आणि राज ठाकरेंवर तोंडसुख घेतलंय.
Apr 14, 2012, 06:27 PM ISTबिहार दिनाचा तिढा सुटणार? आयोजक राज भेटीला
बिहार दिनाचे बिहार दिनाचे आयोजक राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत. देवेश ठाकूर हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. या भेटीत बिहार दिनाबाबतचा वाद संपण्याची विनंती देवेश ठाकूर राज ठाकरेंना करण्याची शक्यता आहे.
Apr 14, 2012, 08:30 AM ISTबिहार दिवसावर वाद हा 'बिनपैशाचा तमाशा'!
बिहार दिनावरुन मनसे आणि नितीश कुमार यांच्यात अखेर समेट झाली. पण, यावर शिवसेनेने आपल्या खास शैलीत टीका केली आहे. बिहार दिनावर आधी वाद आणि नंतर समेट हे तर फिक्सिंग होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Apr 13, 2012, 09:14 PM ISTराज ठाकरेंचा बिहार दिनाला 'ग्रीन सिग्नल'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बिहार दिनाचे आयोजक देवेश ठाकूर यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर बिहाराचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्याशी फोनवरून बोलणे झाल्यानंतर राज यांनी बिहार दिनाला हिरवा कंदील दाखवला. बिहार दिन हा राजकीय कार्यक्रम नसल्याने तो सांस्कृतिक आहे. त्यामुळे आपली काही हरकत नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली.
Apr 13, 2012, 04:24 PM ISTबिहार दिनाला मी मुंबईत जाणारच - नीतिश
बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रतिउत्तर देताना बिहार दिनाचे मला निमंत्रण दिले गेले आहे. त्यामुळे मी उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री या नात्याने मुंबईत जाणार आहे, असे जाहीर केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे हा वाद नीतिश कुमार यांनीच निर्माण केला आ
Apr 13, 2012, 02:29 PM ISTबिहार दिन : राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर बैठक
मुंबईत बिहार दिन साजरा केला जाईल. आम्हाला कोणीही अडवून शकत नाही, असे विधान बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी केले होते. त्यानंतर मालेगावात तुम्ही मुंबईत बिहार दिन साजरा करून दाखवाच, असा इशारा ठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. आज मुंबईत 15 एप्रिल रोजी मुंबईत साजरा करण्यात येणाऱ्या बिहारदिनाबाबत भूमिका ठरविण्यासाठी कृष्णकुंजवर मनसे आमदारांची तातडीची बैठक बोलाविली.
Apr 13, 2012, 01:00 PM ISTबिहार दिन साजरा करून दाखवाच - राज
बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी मुंबईत येऊन बिहार दिस साजरा करून दाखवाच, असे प्रति आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहे. प्रत्येकांने आपल्या राज्याचा दिन त्याच राज्यात साजरा केला पाहिजे. महाराष्ट्र काय धर्मशाळा आहे का?
Apr 12, 2012, 09:43 PM ISTराज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
राज ठाकरे यांची मुलूख मैदान तोफ मालेगावात धडाडली. या भाषणात त्यांनी नीतिश कुमार, अबु आझमी यांच्यासह शिवसेनेवर जोरदार हल्ला चढविला.
Apr 12, 2012, 09:00 PM ISTबिहार दिन तुमच्या राज्यात करा - उद्धव
मुंबईत बिहार दिन साजरा करण्यावरून राज्यातले राजकारण चांगलेच तापले आहे. बिहार दिन महाराष्ट्रात साजरा केला तर महाराष्ट्र दिनही बिहारमध्ये साजरा करावा, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केला आहे.
Apr 12, 2012, 05:31 PM IST