देवभूमीत चोरट्यांचा धुमाकूळ, चेटकीणीची बॅग चोरट्यांनी पळवली

नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Updated: May 11, 2019, 04:34 PM IST
देवभूमीत चोरट्यांचा धुमाकूळ, चेटकीणीची बॅग चोरट्यांनी पळवली title=

किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. नाशकातल्या चोऱ्या दरोड्यांचं प्रमाण कमी होताना दिसत नाही. नाशिकच्या कालिदास कलामंदिरात अलबत्या गलबत्या नाटकाच्या प्रयोगासाठी आलेल्या अभिनेता वैभव मांगलेंच्या टीमला चोरट्यांनी हात दाखवला आहे. नाटकाच्या टीममधील मेकअपमनची बॅगच चोरट्यांनी लांबवली आहे. ही घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे. 

कालिदास कलामंदिर परिसरात अवघा एकच सुरक्षा रक्षक नेमला आहे. सीसीटीव्ही आहेत पण ते प्रभावी दिसत नाहीत. महापालिका मात्र सगळं काही अलबेल असल्याचं सांगते आहे.

विश्वास नांगरे पाटील पोलीस आयुक्तपदी आल्यानंतर त्यांनी नाशिकची गुन्हेगारी कमी करण्याचा आराखडा तयार केला. अलिकडे नाशिकमध्ये वाढलेल्य़ा चोरी आणि दरोड्याच्या घटना पाहता हा आराखडा फक्त कागदावरच असल्याचं दिसतं आहे.