पिचनुसार आमचा खेळ झाला नाही - आफ्रिदी

आशिया कपमध्ये भारताकडून हार पत्करल्यानंतर पाकिस्तानचा टी-२० कर्णधार शाहीद आफ्रिदीने पिचनुसार आपल्या संघाचा खेळ झाला नसल्याचे म्हटलेय.

Updated: Feb 28, 2016, 08:24 PM IST
पिचनुसार आमचा खेळ झाला नाही - आफ्रिदी title=

मिरपूर : आशिया कपमध्ये भारताकडून हार पत्करल्यानंतर पाकिस्तानचा टी-२० कर्णधार शाहीद आफ्रिदीने पिचनुसार आपल्या संघाचा खेळ झाला नसल्याचे म्हटलेय.

बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या शनिवारच्या सामन्यात पाकिस्तानला शनिवारी भारताकडून पाच विकेट राखून पराभव पत्करावा लागला. 

आम्ही खूप क्रिकेट खेळलोय. मला वाटते खेळण्यापूर्वी आम्ही परिस्थितीचे आकलम करायला हवे होते आणि पिचचा अभ्यास करायला हवा होता. आम्ही पिचनुसार खेळ केला नाही, असे आफ्रिदी सामना संपल्यानंतर म्हणाला.