Neem Karoli Baba: तुम्ही कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही! नीम करोली बाबा सांगितलं मागचं खरं कारण!

Motivational Thought : नीम करोली बाबा हे भारतातील एक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु आहे. त्यांनी आपल्या शिकवणींमधून लोकांना भक्ती, सेवा आणि ध्यान याचे महत्त्व पटवून दिले आहेत. 

नेहा चौधरी | Updated: Feb 7, 2025, 07:01 PM IST
Neem Karoli Baba: तुम्ही कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही! नीम करोली बाबा सांगितलं मागचं खरं कारण! title=

Motivational Thought : नीम करोली बाबा हे भारतातील एक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे नीम करोली बाबा यांचे भक्त आहेत. ते अनेक वेळा त्यांच्या आश्रमात दिसून आले आहेत. नीम करोली बाबा यांनी आपल्या शिकवणींमधून लोकांना भक्ती, सेवा आणि ध्यान याचं महत्त्व पटवून दिलंय. त्यांच्या अनुयायांमध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्ती होत्या, ज्यांनी त्यांच्या विचारांमुळे आपले जीवन बदलले. नीम करोली बाबा यांनी काही भक्त हनुमानजींचा अवतार मानतात. पण त्यांच्या शिवकवणींमध्ये असे अनेक मौल्यवान जीवनसूत्र आहे, ज्यामुळे जीवनात आपल्याला प्रेरणा मिळते. आपल्या काही सवयी आणि स्वभावामुळे माणूस आयुष्यात कधीही उंचीवर पोहोचू शकत नाही, याबद्दल सांगितलंय. 

यशस्वी होण्याच्या सवयी

रागावर नियंत्रण ठेवणे

बाबा म्हणत कि माणसाने रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जो माणूस वारंवार रागावतो तो माणून आपलं मोठं नुकसान करुन घेत असतो. रागामुळे आधी मिळवलेलं यशही असे व्यक्ती गमवून बसतात. त्यासोबत भविष्यात येणाऱ्या संधीही हातातून निसटतात. 

अनेकदा रागाच्या भरात घेतलेले चुकीचे निर्णय संपूर्ण आयुष्य संकटात टाकतात. म्हणूनच संतांनी नेहमीच संयम आणि शांत स्वभाव बाळगण्याचा सल्ला देण्यात आलाय. रागीट स्वभावामुळे माणूस चुकलेली पावले उचलतो आणि त्याचे दुष्परिणाम पुढे त्याला भोगावे लागतात.

मनावर ताबा ठेवणे

नीम करोली बाबा असेही म्हणत की, मनावर ताबा ठेवणे हे यशाचे गुपित आहे. जो माणूस आपल्या मनावर ताबा मिळवतो तो आपल्या ध्येयावर अधिक चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रित करण्यात यशस्वी असतो. मात्र जो आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही, त्याला प्रत्येक टप्प्यावर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

अशा व्यक्तींचे मन नेहमीच चंचल राहतं आणि त्यामुळे त्यांना मोठे निर्णय घेताना अडचणी येतात. मानसिक स्थिरता आणि आत्मसंयम असलेल्या व्यक्तीला यश मिळवण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही.

स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवणे

बाबांच्या मते, स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जो माणूस नेहमी इतरांवर अवलंबून असतो तो कधीही पुढे जाऊ शकत नाही. अशा लोकांना स्वतः विचार करून निर्णय घेण्याची सवय लावली पाहिजे. इतरांच्या मतांवर अवलंबून राहणे म्हणजे स्वतःच्या क्षमतांवर शंका घेणे होय. जो माणूस स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवतो तोच खऱ्या अर्थाने पुढे जातो आणि जीवनात यशस्वी होतो.

कमकुवत मानसिकता

तसंच नीम करोली बाबा असेही सांगत की, कमकुवत मानसिकता असलेले लोक कधीही मोठे यश मिळवू शकत नाहीत. मानसिकरित्या कमकुवत असलेल्या लोकांना नेहमीच इतरांवर अवलंबून राहावे लागते आणि त्यामुळे त्यांना संधी मिळूनही ते त्या संधींचा फायदा घेऊ शकत नाहीत.

कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास टिकवणे हे जीवनातील सर्वात मोठे आव्हान असते. ज्या लोकांचा आत्मविश्वास कमी असतो ते मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यास घाबरतात आणि त्यामुळे ते कायम मागे राहतात.

अस्वस्थ आणि अस्थिर मन

अंतिम महत्त्वाची गोष्ट म्हणजे अस्थिर आणि अस्वस्थ मनाचा माणूस जीवनात मोठे निर्णय घेऊ शकत नाही. नीम करोली बाबा असे सांगत की, जो माणूस नेहमी अस्वस्थ आणि अस्थिर असतो तो योग्य निर्णय घेऊ शकत नाही. अशा लोकांचे मन नेहमीच गोंधळलेले असते आणि त्यामुळे ते संधींचा फायदा घेऊ शकत नाहीत.

अस्थिर मन माणसाला आपल्या ध्येयापासून दूर नेतं आणि त्यामुळे तो यशाच्या मार्गावर जाताना अनेक अडथळ्यांना सामोरे जाते. मन स्थिर आणि शांत असेल तर कोणतीही परिस्थिती सहज हाताळता येते आणि यश लवकर मिळते.

नीम करोली बाबांच्या शिकवणींमध्ये जीवनाचे खरं तत्त्वज्ञान आहे. जर कोणी या सवयी सुधारल्या आणि त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात लागू केले तर तो निश्चितपणे यशाच्या मार्गावर जाऊ शकतो. संयम, आत्मसंयम, आत्मविश्वास आणि मनाची स्थिरता हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे असे बाबा सांगत असत.