18 जूनपर्यंत भारतात कोरोना महामारी संपुष्टात येणार?

कोरोनाचा हाहाकार पाहता, लोक घाबरुन गेले आहेत. अशावेळी जर कोणी म्हटले की कोरोना एका महिन्यात संपुष्टात येणार आहे. या सारखी दिलासा देणारी दुसरी बातमी नसेल. मात्र...

Updated: May 24, 2021, 12:40 PM IST
18 जूनपर्यंत भारतात कोरोना महामारी संपुष्टात येणार? title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोनाचा हाहाकार पाहता, लोक घाबरुन गेले आहेत. अशावेळी जर कोणी  म्हटले की कोरोना एका महिन्यात संपुष्टात येणार आहे. या सारखी दिलासा देणारी दुसरी बातमी नसेल. मात्र, आपण यावर विश्वास ठेवाल का? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एखाद्या पोस्टवर जर विश्वास ठेवायचा झाले तर सिंगापूरमधील एका विद्यापीठाचा हवाला देत असे म्हटले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ पोस्टमध्ये म्हटले आहे, 18 जूनपर्यंत भारत कोविड -19 या आजारापासून पूर्णपणे मुक्त होईल. 

व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे...

18 जूनपर्यंत भारत कोविड -19 या आजारापासून पूर्णपणे मुक्त होईल. जगातील 131 देशांमध्ये कोरोनावर सर्वेक्षण करण्यात आले आणि भारताच्या अहवालानुसार 21 मे पर्यंत भारत कोरोनापासून 97 टक्के मुक्त होईल. 18 जूनपर्यंत भारत कोरोनापासून पूर्णपणे मुक्त होईल. असा दावा सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी अ‍ॅण्ड डिझाइनने केला आहे. हे विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे केले गेले आहे. रुग्णांची संसर्ग आणि पुनर्प्राप्ती आधारभूत आहे. 8 डिसेंबरपर्यंत जगातून कोरोना विषाणूचा नष्ट होईल. इटली आणि स्पेनविषयी या विद्यापीठाचा डेटा अचूक आहे." 

नेमकं सत्य काय आहे?

 सिंगापूर विद्यापीठाने केलेल्या संशोधनाद्वारे ज्याचा दावा केला जात आहे, ते एका वर्षापूर्वी केले गेले होते. त्यामध्ये हे स्पष्टपणे लिहिले होते की कोविड -19 संबंधित आकडेवारी बदलल्यास हे निकालही बदलतील.

हे खरे आहे की 'सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी अ‍ॅण्ड डिझाइन' ने गेल्यावर्षी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने जगातील 131 देशांवर संशोधन केले आणि कोविड -19 ची महामारी कधी संपेल याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. परंतु हे संशोधन त्यावेळी उपलब्ध आकडेवारीच्या आधारे केले गेले होते. बदलत्या आकडेवारीनुसार या संशोधनाचे निकाल दररोज बदलत असल्याचे स्पष्टपणे लिहिले होते.

हे संशोधन एप्रिल 2020 च्या एका वर्षाच्या आधी केले गेले. त्यावेळी कोविड -19 ची प्रकरणे भारतात फारच कमी होती. 30 एप्रिल 2020 पर्यंत भारतात कोविड संसर्गाची सुमारे 33 हजार प्रकरणे झाली. सद्यस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास, 21 मे 2021 पर्यंत भारतात कोविडची सुमारे दोन कोटी 60 लाख रुग्णांची संख्या नोंदली गेली आहेत.

सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी अ‍ॅण्ड डिझाइनच्या या संशोधनाशी संबंधित लेखात असेही लिहिले आहे की, "या संकेतस्थळात दिलेली माहिती केवळ शैक्षणिक आणि संशोधनाशी संबंधित आहे. यात त्रुटी असू शकतात. वेगवेगळ्या देशांतील कोविडशी संबंधित आकडेवारी जटील आहे आणि ती सतत आणि वेगाने बदलत आहे. अशा परिस्थितीत या आकडेवारीत चुका होऊ शकतात. या संशोधनात दिलेल्या डेटाच्या आधारे अधिक अपेक्षा करणे धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते आणि यामुळे व्हायरसवरील आपले नियंत्रण कमकुवत होऊ शकते. "

सध्या हे संशोधन 'सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी अ‍ॅण्ड डिझाइन' च्या संकेतस्थळावर उपलब्ध नाही, परंतु त्याची संग्रहित आवृत्ती येथे पाहता येईल. आमच्या तपासणीवरून हे स्पष्ट झाले आहे की, सिंगापूर युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड डिझाइनचा अहवालाचा आधार दिला असला तरी 18 जूनपर्यंत भारतात कोरोना महामारी संपुष्टात येईल, ही बाब गेल्यावर्षीची अल्याचे दिसून येत आहे.