Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : असं नेमकं काय झालं? दिग्दर्शकाने राग व्यक्त करत केलं ट्विट

चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी 

Updated: Apr 7, 2021, 04:29 PM IST
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : असं नेमकं काय झालं? दिग्दर्शकाने राग व्यक्त करत केलं ट्विट  title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. मात्र हा कार्यक्रम सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिलेला आहे. टीआरपीमध्ये तर या शोने अनेकदा टॉप 5 ची जागा पटकावली आहे. मात्र आता या कार्यक्रमाची जादू काही कमी झाली आहे. या कार्यक्रमाबाबत प्रेक्षक तक्रार करताना दिसत आहेत. 

ही आहे लोकांची तक्रार 

काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमात बदल करण्यात आले आहेत. यावर प्रेक्षक नाराज आहेत. झालेल्या बदलावर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' कार्यक्रमाची क्वालिटी आता तशी राहिलेली नाही. अनेकांनी दिग्दर्शकांना टॅग करत आपलं मत नोंदवलं आहे.  

येथे एक युजरने लिहिले आहे, 'शो कॉमेडीच्या बाबतीत आता आपल्या सर्वात खालच्या पातळीवर आहे. कोणतीही स्थिती नाही आणि सीन-बार-रिपीट करताना आदित्य जेव्हा नवीन ग्रुप ज्वॉइन होता ...खूप वाईट पद्धतीने मांडलं आहे. अगदी chewing gum बनवल्या सारखं केलं आहे? 

याव्यतिरिक्त, एक युजरने सांगितले की, पात्रांच आयुष्य सेम टू सेम बघून आता आम्हाला कंटाळा आला आहे. तर यामध्ये लवकरच चांगला बदल करावा असं वाटतं