500 वी

500 वी टेस्ट मॅच असणार भारतासाठी खास

टीम इंडियासाठी कानपूर टेस्ट ही खास असणार आहे. ग्रीनपार्क स्टेडिअममध्ये होणारी ही टेस्ट मॅच भारतीय क्रिकेट इतिहासातील 500 वी टेस्ट असणार आहे. 300 वी आणि 400 वी टेस्ट मॅच टीम इंडियाने जिंकली होती. आता 500 वी टेस्ट जिंकून भारतीय टीम हॅट्रीक करणार का याकडे लक्ष लागून आहे. आणखी एक खास गोष्ट म्हणजे अनिल कुंबळे सुद्धा या टेस्ट मॅचशी संबंधित आहे. कारण 300 व्या आणि 400 व्या टेस्ट मॅचमध्ये अनिल कुंबळेने खास भूमिका निभावली होती.

Sep 21, 2016, 04:49 PM IST