खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची? जनतेनं दाखवून दिलं, अमित शाहांचा ठाकरे-पवारांवर हल्लाबोल

पुणे दौऱ्यावर असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना यांच्यावर खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची? म्हणत ठाकरे-पवारांवर हल्लाबोल केला. 

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 23, 2025, 08:38 PM IST
खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची? जनतेनं दाखवून दिलं, अमित शाहांचा ठाकरे-पवारांवर हल्लाबोल

Amit Shah On Sharad Pawar and Uddhav Thackeray : पुणे दौऱ्यावर असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना टोला लगावला होता. दरम्यान यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील अमित शाहांना प्रत्युत्तर दिलंय. काय म्हटलं होतं अमित शाहांनी. पाहुयात सविस्तर

केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शाह हे पुणे दौऱ्यावर होते. अमित शाह यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा केल्याचं म्हटलं जात आहे. तर अमित शाह यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसोबत महत्वाची बैठक घेणार असल्याची माहिती देखील समोर आली होती. त्यासोबत प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील 20 लाख लाभार्थ्यांना अमित शाह यांच्या हस्ते घरकुलांचे मंजुरीपत्र देखील वाटण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. 

दरम्यान, याच कार्यक्रमात बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना  डिवचलंय. भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचं सरकार जनतेने बनवलं. जनतेने महायुती सरकारला बहुमत दिलं.  खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची हे जनतेनं दाखवल्याचं म्हणत अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. दरम्यान यानंतर ठाकरेंच्या शिवसेननंही अमित शाह यांच्यावर जोरदार  पलटवार केलाय.

शाहांच्या टीकेला ठाकरेंकडून प्रत्युत्तर 

अमित शाह यांनी केलेल्या टीकला उद्धव ठाकरे यांनीही उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की,  त्यांना वाटतं त्यांनी शिवसेना संपवली मात्र आजही निष्ठावंत शिवसैनिक सोबत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाची यावरुन आरोप-प्रत्यारोप होत असतात. दरम्यान विधानसभेत अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालेल्या यशानंतर आमचाच पक्ष खरा असल्याचा दावा दोन्ही नेत्यांकडून करण्यात आला आहे.