काँग्रेस सरकार नसेल तर देशाचं विघटन होईल- मुख्यमंत्री

देशाला मजबूत सरकारची आवश्यकता आहे, आणि ते फ़क़्त काँग्रेसच देऊ शकते, जर स्थिर सरकार मिळालं नाही, तर देशाचे विघटन होण्याची भीती असल्याचं धक्कादायक विधान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 28, 2013, 10:19 PM IST

www.24taas.com, पुणे
देशाला मजबूत सरकारची आवश्यकता आहे, आणि ते फ़क़्त काँग्रेसच देऊ शकते, जर स्थिर सरकार मिळालं नाही, तर देशाचे विघटन होण्याची भीती असल्याचं धक्कादायक विधान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय.
पुण्यात सुरु असलेल्या वक्ता मार्गदर्शन शिबिरात त्यांनी हे वक्तव्य केलंय. या वेळी बोलताना कपिल सिब्बल यांनीही या वेळी बोलताना नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. नरेंद्र मोडी म्हणजे मृगजळ आहे अशी बोचरी टीका त्यांनी केलीय.

विरोधी पक्षात सुरु असलेल्या पंतप्रधान पदाच्या उमेद्वारीवरही त्यांनी टीका करत देशाला फक्त काँग्रेसच प्रगत सरकार देवू शकत असा दावा त्यांनी केला आहे.