रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकूश राणे यांचे खून कोणी केले; राणेंच्या आरोपांवर शिवसेनेचाही हल्लाबोल

Vinayak Raut on Narayan Rane |  एखाद्या केंद्रीय मंत्र्यांने ईडीच्या नावाने धमक्या देणं याबाबत आम्ही संसदेत आवाज उचलणार आहोत असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. सिंधुदूर्गात झालेल्या राजकीय हत्यांचाही मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Updated: Feb 19, 2022, 02:36 PM IST
रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकूश राणे यांचे खून कोणी केले; राणेंच्या आरोपांवर शिवसेनेचाही हल्लाबोल title=

मुंबई :  एखाद्या केंद्रीय मंत्र्यांने ईडीच्या नावाने धमक्या देणं याबाबत आम्ही संसदेत आवाज उचलणार आहोत असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. सिंधुदूर्गात झालेल्या राजकीय हत्यांचाही मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला.

एखाद्या केंद्रीय मंत्र्यांने ईडीच्या नावाच्या धमक्या देणे  हा केंद्रीय पदाचा दुरूपयोग आहे. हे बोलताना त्यांनी ईडीच्या कागदपत्रांची चोरी केलीये का? किंवा ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी त्याच्याशी हातमिळवणी केली असेल. ईडी कशा सुपाऱ्या वाजवते. त्यांचे सुरू असलेले उपद्व्याप याबाबत आम्ही संसदेत आवाज उचलणार आहोत.

सकाळी नारायण राणे यांनी अत्यंत पुचाट आरोप केले आहे. परंतू दुसऱ्यावर खुणाचे आरोप करीत असताना, त्यावेळी त्यांना काही गोष्टी आठवण करून द्यायच्या आहेत.

राणेंच्या कार्यकाळात सिंधुदूर्गात खून, मारहाण, दमदाटी धमक्यांचे प्रकार ९ वर्ष सुरू होते. दरम्यानच्या काळात रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकूश राणे यांचे निर्घुन खून कोणी केले. श्रीधर नाईक यांच्या खूनात तर प्रत्यक्ष आरोपी कोण होतं. हे आम्हाला बोलायला लावू नका. या सर्व खुनांच्या मागे कोण होतं हे महाराष्ट्राला माहित आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी तर विधीमंडळात राणेंच्या इतिहासाची कुंडली वाचली होती.  त्यात ते म्हणतात की, रमेश गोवेकरांचं काय झालं, अंकूश राणे यांचं काय झालं? हे लक्षात घेतल्यावर पार्टी विथ क्रिमिनल कोण आहेत. हे लक्षात येतं.' 

आम्ही उद्या राज्याचे गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांना भेटणार आहोत. सिंधुदूर्गातील राजकिय हत्यांबाबत पुन्हा चौकशी करण्याचे आम्ही निवेदन देणार आहोत. 

नारायण राणे यांनी भ्रष्ट्राचाराचे आरोप करणे म्हणजे हस्यास्पद आहे. किरिट सोमय्यांनी नारायण राणे यांच्यावर एकेकाळी भ्रष्ट्राचाराचा आऱोप केला होता. त्याबाबतही चौकशी करण्याची विनंती आम्ही करणार आहोत. राणे यांनी त्यांच्या शैक्षणिक संस्थांच्या जमिनी शेतकऱ्यांकडून दमदाटीने हडपल्याचाही आरोप विनायक राऊत यांनी केले आहे.