'आई कुठे काय करते' मालिकेत ट्विस्ट, अभिषेक-अनघाच्या साखरपुड्यात विघ्न

संजना पुन्हा एकदा देशमुख कुटुंबाला दुःख देण्यास सज्ज 

Updated: May 10, 2021, 05:33 PM IST
'आई कुठे काय करते' मालिकेत ट्विस्ट, अभिषेक-अनघाच्या साखरपुड्यात विघ्न  title=

मुंबई : स्टार प्रवाहवरील मालिका 'आई कुठे काय करते' एका वेगळ्या वळणावर आहे. अनिरूद्ध आणि अरूंधती यांचा लवकरच घटस्फोट होईल. अरूंधती घरातून निघून जाण्यापूर्वीच नवी व्यक्ती देशमुख कुटुंबात प्रवेश करणार आहे. अभिषेक-अनघाच्या साखरपुड्यामुळे सगळेच आनंदात आहेत. कोरोनाचा कहर वाढल्यामुळे अभिचा साखरपुडा कोकणात करण्याचा निर्णय घेतात. असं असताना आता मालिकेत एक नवं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 

अभिषेकच्या भुतकाळाबद्दल बोलायचं झालं तर अंकितासोबत अभिषेक काही वर्षे रिलेशनशिपमध्ये होता. या दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. मात्र अंकिताला परदेशात जायचं असतं आणि ती अभिषेकसोबतच नातं तोडून परदेशात जाते. या काळात अभिषेक खूप एकटा पडतो. अशा परिस्थितीत त्याच्या आयुष्यात अनघाचा प्रवेश होतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Spotlight Marathi (@spotlightmarathi)

अरूंधतीच्या आयुष्यात आलेल्या वादळामध्ये अनघ खूप मोठा आधार बनते. या दरम्यानच अभिषेक आणि अनघा एकत्र येतात. त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर होतं. आता हे दोघं आपल्या नात्याला नाव देत आहेत. या दोघांच्या साखरपुड्याची जय्यत तयारी सुरू आहे. 

आनंदाच्या या क्षणात माशी शिंकते. यावेळी संजना देखील तेथे पोहोचते. म्हणून देशमुख कुटुंबिय दुःखी देखील होतं. मात्र या पुढे असं दाखवण्यात आलं आहे की, अनघाच्या ऐवजी अभिषेकचं लग्न झाल्याचं दाखवलं आहे. 

यामध्ये पुन्हा एकदा संजनाचा हात असल्याचं समोर येतं. संजना अंकिताला अभिषेकच्या साखरपुड्याची माहिती देते. आणि अंकिता तेथे पोहोचते. यापुढे काय होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.