विराट कोहली याचा कर्णधारपद सोडण्यास नकार; BCCIने थेट दाखवला बाहेरचा रस्ता, झाला मोठा खुलासा

टीम इंडियाचा महान फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याची वनडे संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विराट कोहली (Virat Kohli) याच्या जागी रोहित याला ही कमान देण्यात आली आहे. 

Updated: Dec 9, 2021, 08:36 AM IST
विराट कोहली याचा कर्णधारपद सोडण्यास नकार; BCCIने थेट दाखवला बाहेरचा रस्ता, झाला मोठा खुलासा  title=

मुंबई : टीम इंडियाचा महान फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याची वनडे संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विराट कोहली (Virat Kohli) याच्या जागी रोहित याला ही कमान देण्यात आली आहे. यावर्षी विराट याने टी-20चे कर्णधारपद सोडले आहे. पण दरम्यान, विराटला एकदिवसीय संघाची कमान सोडायची नव्हती आणि बीसीसीआयने ( BCCI) त्याच्याकडून कर्णधारपद बळजबरीने काढून घेतल्याचा मोठा खुलासा झाला आहे.

BCCIने विराटकडून कर्णधारपद हिरावून घेतले

विराट कोहली याची विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर हे घडणार होते आणि बुधवारी बीसीसीआयने त्याला भारताच्या वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवून रोहित शर्मा याच्याकडे कर्णधारपद सोपवले. बीसीसीआयने (BCCI) 48 तास दिले होते. मात्र कोहली वनडे संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याची वाट पाहिली पण त्याने तसे केले नाही. त्यानंतर 49व्या तासात कोहली याच्याकडून रोहित शर्मा याला हे स्थान देण्यात आले. बीसीसीआयने रोहित शर्मा याची निवड केल्याची घोषणा केली. निवड समितीने रोहितला वनडे आणि टी-२० संघांचे कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आणि कोहली याला आपले कर्णधारपद गमावावे लागले.

2023 विश्वचषकाचा निर्णय

BCCI आणि राष्ट्रीय निवड समितीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत कोहलीला नवा कर्णधार नेमायचा असल्याने त्याला कर्णधारपदावरून हटवले. T20 विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमधून ज्या क्षणी भारत बाहेर पडला, त्या क्षणी कोहली याची कर्णधारपदावरून हकालपट्टी जवळपास निश्चित झाली होती, परंतु बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना गेल्या साडेचार वर्षांपासून संघाच्या कर्णधाराला सन्माननीय मार्ग द्यायचा होता. शेवटी असे दिसते की कोहली याने बीसीसीआयला त्याला काढून टाकण्यास सांगितले आणि खेळाच्या सर्वोच्च संस्थेने पुढे जाऊन तेच केले आणि नंतर ते स्वीकारण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरला नाही.

कोहली याचा चांगला प्रवास

कोहली याचा कर्णधारपदाचा काळ हा एक अद्भुत कथा आहे. 'कूल' महेंद्रसिंह धोनीने कोहली याला आपल्या नेतृत्वाखाली तयार केले आणि नंतर जेव्हा त्याला वेळ आली असे वाटले तेव्हा त्याने पांढऱ्या चेंडूची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. पुढच्या 2 वर्षात कोहली संघाचा चांगला कर्णधार बनला जो आपल्या मनाप्रमाणे गोष्टी करु लागला. त्यानंतर काही गोष्टी खटकू लागल्या. त्यानंतर प्रशासकांची समिती स्थापन केली ज्याने त्यांची प्रत्येक मागणी (काही योग्य आणि काही चुकीची) पूर्ण केली. त्यानंतर पारंपारिक प्रशासकांचे पुनरागमन झाले. ज्यात अत्यंत शक्तिशाली सचिव आणि अध्यक्ष होते. ज्यांना स्वतःला यशस्वी कर्णधारपदाची माहिती होती.