धोनी आणि रोहित भारताचा बेस्ट कॅप्टन नाहीच, तर हा आहे भारताचा सर्वोत्तम कर्णधार...

टीम इंडियाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौथ्या दिवशी न्यूझीलंडविरुद्ध मोठा विजय नोंदवला

Updated: Dec 7, 2021, 08:35 AM IST
धोनी आणि रोहित भारताचा बेस्ट कॅप्टन नाहीच, तर हा आहे भारताचा सर्वोत्तम कर्णधार...  title=

मुंबई : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने जे पराक्रम गाजवले ते इतर कोणत्याही कर्णधाराला करता आलेले नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दोनदा विश्वचषक आणि एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. पण यादरम्यान टीम इंडियाच्या एका दिग्गज खेळाडूने धोनीपेक्षा चांगला कर्णधार असलेल्या खेळाडूचे नाव सांगितले आहे.

'या' खेळाडूला ठरवलं सर्वोत्तम कर्णधार 

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने मुंबई कसोटीत न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकल्याबद्दल कर्णधार विराट कोहलीचे कौतुक करत, कोहली हा भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्तम कसोटी कर्णधार असल्याचे म्हटले आहे. इरफानने ट्विटरवर लिहिले, 'कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने सोमवारी वानखेडे स्टेडियमवर ब्लॅक कॅप्सचा 372 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करून मालिका जिंकली. इरफान पुढे म्हणाला, 'मी आधी म्हटल्याप्रमाणे आणि पुन्हा सांगतो, कोहली भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्तम कसोटी कर्णधार आहे. तो ५९.०९ टक्के जिंकून अव्वल स्थानावर आहे.

विराट करतोय कमाल 

मुंबईतील विजयासह भारताने घरच्या मैदानावर सलग १४व्या मालिका विजयाची नोंद केली. त्याचबरोबर कोहलीच्या नेतृत्वाखाली सलग 11वा विजय मिळवला. घरच्या मालिकेतील विजयासह, भारताने 12 गुण मिळवले आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचले. आता त्याला 124 गुण मिळाले आहेत.

त्याचवेळी, न्यूझीलंड १२१ रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. 8 डिसेंबरपासून ऍशेस मालिकेला सुरुवात होणारी ऑस्ट्रेलिया 108 गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे, तर चौथ्या स्थानावरील इंग्लंड ऑस्ट्रेलियापेक्षा फक्त एक गुण मागे आहे. त्यापाठोपाठ पाकिस्तान (92), दक्षिण आफ्रिका (88), श्रीलंका (83), वेस्ट इंडिज (75), बांगलादेश (49) आणि झिम्बाब्वे (31) यांचा क्रमांक लागतो. भारत आता 26 डिसेंबरपासून तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.

मुंबईत टेस्टमध्ये विजय 

टीम इंडियाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौथ्या दिवशी न्यूझीलंडविरुद्ध मोठा विजय नोंदवला आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशी खिशात घातली. भारतीय खेळाडूंनी वानखेडेवर कानपूर कसोटी पूर्ण केली. न्यूझीलंडविरुद्ध, टीम इंडियाला हा कसोटी सामना आणि मालिका काबीज करण्यासाठी सोमवारी केवळ 4 विकेट्सची गरज होती, जी त्यांनी सहज गाठली. भारताने किवी संघाचा ३७२ धावांनी पराभव केला. धावांच्या बाबतीत भारतीय क्रिकेट संघाचा हा सर्वात मोठा विजय आहे.