कोल्हापूर टोल प्रश्न चिघळणार, CM चे स्वागत बंदने होणार

कोल्हापूरमधील टोलच्या प्रश्नांवरुन टोल विरोधी कृती समिती पुन्हा एकदा आक्रमक झालीय. कोल्हापूर बंद ठेवून मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. 

Updated: Aug 22, 2014, 10:59 PM IST
कोल्हापूर टोल प्रश्न चिघळणार, CM चे स्वागत बंदने होणार title=

कोल्हापूर : कोल्हापूरमधील टोलच्या प्रश्नांवरुन टोल विरोधी कृती समिती पुन्हा एकदा आक्रमक झालीय. कोल्हापूर बंद ठेवून मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. 

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 26 ऑगस्टला कोल्हापूर दौ-यावर येणार आहेत. त्यादिवशी टोलविरोधी कृती समितीनं कोल्हापूर जिल्हा बंदची हाक दिलीय. एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री कोल्हापुरात आले तर त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविण्याचा निर्धारही कृती समितीच्या सदस्यांनी केलाय. 

जोपर्यंत कोल्हापूरच्या टोलचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचा निर्णय समितीच्या सदस्यांनी घेतलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.