नारायण राणे- धनंजय मुंडेंमध्ये आरोप-प्रत्यारोप

ज्यांचा स्वाभिमान भाजपने जपला नाही त्यांनी कितीही सभा घेतल्या तरी जनतेवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही 

Updated: Feb 11, 2018, 08:46 PM IST
नारायण राणे- धनंजय मुंडेंमध्ये आरोप-प्रत्यारोप title=

औरंगाबाद : ज्यांचा स्वाभिमान भाजपने जपला नाही त्यांनी कितीही सभा घेतल्या तरी जनतेवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असा टोला विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी नारायण राणे यांना लगावला. त्यावर धनंजय मुंडे खूप लहान आहेत, त्यांनी उगाच माझ्यावर बोलू नये मी सुरु झालो तर अवघड होईल अशा शब्दात नारायण राणे यांनी धनंजय मुंडे यांना प्रत्युत्तर दिलं.