Udayanraje Bhosale : उदयनराजे संतप्त, महाराजांचा अपमान करणाऱ्या कोश्यारी यांना टकमक टोकावरुन...

Udayanraje Bhosale : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना टकमक टोकावरुन फेकून दिलं असते, असे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी म्हटले आहे. 

Updated: Dec 3, 2022, 02:40 PM IST
Udayanraje Bhosale : उदयनराजे संतप्त, महाराजांचा अपमान करणाऱ्या कोश्यारी यांना टकमक टोकावरुन... title=
Udayanraje Bhosale on Bhagat Singh Koshyari

Udayanraje Bhosale on Bhagat Singh Koshyari : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना टकमक टोकावरुन फेकून दिलं असते, असे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी म्हटले आहे. राज्यपालांची तातडीने हकालपट्टी करावी,अशी मागणी त्यांनी केली. (Maharashtra News in Marathi) राज्यपाल पदावरुन भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी आज खासदार उदयनराजे भोसले यांचं रायगडावर आक्रोश आंदोलन केले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी रायगडावर शेकडो समर्थक उपस्थित होते. (Maharashtra Political News)

कोश्यारी इथे रायगडावर असते तर त्यांना टकमक टोकावरुन खाली टाकलं असतं असं उदयनराजे भोसले म्हणाले. राज्यपालांविरोधात लवकरच आझाद मैदानात एल्गार करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन राज्यात दौरा करणार असल्याचंही ते आपल्या भाषणात म्हणाले. उदयनराजेंनी रायगडावर निर्धार शिवसन्मानाचा हे आंदोलन केले. राज्यपालांना पाठिशी घालणारेही तितकेच दोषी आहेत, असं उदयनराजे यांनी राजकीय नेत्यांना सुनावले आहे. राज्यपालपदावरुन कोश्यारींना हटवण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवल्यानंतरही कारवाई न झाल्याने उदयनराजे संतापले आहेत.  (हेही वाचा - महाराजांचा अपमान होताना आपण गप्प बसणार का ?')

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनी लोकशाहीचा ढाचा निर्माण केला आहे. (Maharashtra Political News ) महाराजांनी सर्वधर्म समभाव विचार दिला. जुलमी राजवटीतून मोकळा श्वास महाराजांनी दिला. शिवरायांचा सतत अपमान केला जातोय. राज्याला विचार देणाऱ्या महाराजांचीच विटंबना. महाराजांचा अपमान. तरी सर्वजण ऐकून घेत आहेत. काहीजण समर्थनाच धाडसंही दाखवता. 'महाराजांचा अपमान होताना आपण गप्प बसणार का, असा थेट सवाल उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale ) यांनी विचारला आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरुन उदयनराजे आक्रमक झाले आहेत. 

महाराजांचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही,  महाराजांच्या अपमान सहन करणंही चूक आहे. सर्वधर्मसहभागाच्या विसर पडल्यास देशाची फाळणी उघड आहे. महाराजांच्या विचारांचा विसर पडल्यास देश फुटला म्हणून समजा, अशी भीती उदयनराजे यांनी व्यक्त केली आहे. महाराजांच्या अपमानावरुन पांघरुण घालताना लाज वाटली पाहिजे. राज्यापाल पदावरुन महापुरुषांचा अपमान होतो आहे. खिल्ली उडवत असताना आपण पाहात बसलो आहोत? महाराजांचा अपमान आपला सर्वांचा अपमान आहे. विकृत लोकांच्या तावडीत देश गेलाय. पदावर बसलेले लोक रयतेमुळे आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. अपमान झाल्यावर गप्प बसले, नीतीमत्ता गेली कुठे?, 'चूक ती चूक पांघरुण घालणाऱ्यांना जागा दाखवायची वेळ आली आहे, असा इशारा उदयनराजे यांनी यावेळी दिला.

प्रत्येक राजकीय पक्ष स्वार्थी झालाय. महाराजांचं नाव घेता पण विचार विसरता. सध्या मात्र स्वत:च्या फायद्याचा विचार होत आहे. 'देशाचे 30 तुकडे व्हायला वेळ लागणार नाही' 'स्वार्थी, व्यक्तिकेंद्री राजकरण झाले आहे, असे सांगत शिवाजी महाराजांच्या वक्तव्यावरुन  उदयनराजे यांनी सर्व राजकारणांना टोला लगावला.