गोविंदाच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

दहीहंडीसाठी राज्य सरकारनं गोविंदांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या आहेत असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला केलाय. 

Updated: Jul 10, 2017, 04:44 PM IST
गोविंदाच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल title=

भारत : दहीहंडीसाठी राज्य सरकारनं गोविंदांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या आहेत असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला केलाय. 

यासंदर्भात लेखी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयानं सरकारला दिले आहेत. यावरील पुढील सुनावणी २ ऑगस्टला घेण्यात येणार आहे. 

दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. त्यावर सध्या सुनावणी सुरू आहे.