श्रीलंकेसमोर विजयासाठी ३९३ धावांचे आव्हान

भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेसमोर विजयासाठी ३९३ धावांचे आव्हान ठेवण्यात आलेय.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 13, 2017, 03:14 PM IST
श्रीलंकेसमोर विजयासाठी ३९३ धावांचे आव्हान title=

मोहाली : भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेसमोर विजयासाठी ३९३ धावांचे आव्हान ठेवण्यात आलेय.

हिटमॅन रोहित शर्माच्या नाबाद २०० धावांच्या खेळाच्या जोरावर भारताने या सामन्यात ४ बाद ३९२ धावा केल्या. रोहित नावाचे वादळ मोहालीच्या मैदानावर आज पाहायला मिळाले. 

रोहितने नाबाद २०८ धावा झळकावल्या. भारताची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर शिखर धवनने ६८ धावांची खेळी केली. त्यानंतर श्रेयस अय्यरने ८८ धावा केल्या.  धोनीला केवळ ७ धावा करता आल्या. मोठा फटका खेळण्याच्या नादात तो बाद झाला. हार्दिक पांड्या ८ धावांवर नाबाद राहिला. 

श्रीलंकेच्या गोलंदाजांना रोहित शर्माने सळो की पळो करुन सोडले. सेंच्युरी झाल्यावर रोहित शर्माने जबरदस्त फटकेबाजी करत संघाला चारशेच्या घरात नेऊन ठेवले.