राज्य शासनाच्या कठोर निर्णयामुळे अंबानींच्या अन्टालियाचे भवितव्य टांगणीला?

राज्य शासनाने  वक्फ बोर्डाच्या जमिनिबाबत शासनाचा कठोर निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अन्टालियाबाबत आता काय निर्णय होणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

Updated: Apr 13, 2016, 09:58 PM IST
राज्य शासनाच्या कठोर निर्णयामुळे अंबानींच्या अन्टालियाचे भवितव्य टांगणीला? title=

मुंबई : राज्य शासनाने  वक्फ बोर्डाच्या जमिनिबाबत शासनाचा कठोर निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अन्टालियाबाबत आता काय निर्णय होणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

राज्य शासनाचे ठळक मुद्दे

- वक्फ बोर्डाच्या जमिनिबाबत शासनाचा कठोर निर्णय
- वक्फ बोर्डाच्या मालमत्तेच्या उताऱ्यावर फक्त वक्फ संस्थेचे नाव लागणार
- या मालमत्तांवरील सर्व नोंदी रद्द करून त्या वक्फ संस्थेच्या नावे करणार
- वक्फ बोर्डाच्या जमीनी बेकायदेशीर रित्या हस्तांतरीत झाल्या आहेत
- यापुढे वक्फ मालमत्ताच्या उताऱ्यावर कोणत्याही खासगी इसमाचे नाव नोंदवण्यात येणार नाही
- जिथे खाजगी संस्था अथवा व्यक्तींची नावे असतील तर तिथे सुनावणी घेऊन वक्फ संस्थेचे नाव लावणार
- वक्फच्या जमीनी काही संस्थांनी खाजगी व्यक्तींनी विकत, भाडेपट्ट्याने अथवा इतर मार्गाने देण्यात आल्या आहेत
- या सर्व जमीनींवर वक्फ संस्थांची मालकी लागणार
- अंबानींच्या अन्टालियाबाबत आता काय निर्णय़ होणार याबाबत उत्सुकता