आमिर देशद्रोही आहे : मनोज तिवारी

'अतुल्य भारत'च्या जाहिरातीतून हटवण्यात आलेला बॉलीवूड अभिनेता आमिर खानवर पुन्हा एकदा टीका सुरु झालीये. शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी आमिरवर जोरदार हल्ला बोल केला.

Updated: Jan 9, 2016, 07:12 PM IST
आमिर देशद्रोही आहे : मनोज तिवारी title=

नवी दिल्ली : 'अतुल्य भारत'च्या जाहिरातीतून हटवण्यात आलेला बॉलीवूड अभिनेता आमिर खानवर पुन्हा एकदा टीका सुरु झालीये. शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी आमिरवर जोरदार हल्ला बोल केला.

आमिर देशद्रोही आहे. त्याला बाहेर काढले पाहिजे अशा शब्दात त्यांनी आमिरवर टीका केली. मात्र काही वेळातच त्यांना याबद्दल मीडियाने विचारले असता आपण असे काही बोललोच नाही असे सांगत कानावर हात ठेवले. 

स्थायी समितीच्या बैठकीदरम्यान तिवारी यांच्या विधानावर विरोध दर्शविला जाऊ लागला. त्यांच्या विधानावर तिवारी यांनीही सफाई दिली.