आर्यनला जामीन मिळाला तेव्हा शाहरुख 'मन्नत' सोडून नेमका कुठे गेलेला?

तुरूंगात असलेल्या मुलासाठी शहारुखने घेतला मोठा निर्णय  

Updated: Oct 29, 2021, 12:04 PM IST
आर्यनला जामीन मिळाला तेव्हा शाहरुख 'मन्नत' सोडून नेमका कुठे गेलेला? title=

मुंबई : गेल्या 25 दिवसांपासून  अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स केज प्रकरणामुळे तुरूंगात होता. मुलाला जामीन मिळावा म्हणून शाहरुखने दिग्गज वकिलांची नेमणूक केली. अखेर गुरूवारी झालेल्या सुनावणी दरम्यान आर्यनला जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर झाल्यानंतर आर्यन 'मन्नत'वर येणार आहे. दरम्यान, 'मन्नत'वर दिवाळी साजरी होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला. पण गुरूवारी झालेल्या सुनावणीनंतर 'मन्नत'मध्ये दिवाळीचे फटाके वाजणार आहेत. 

आज संध्याकाळपर्यंत आर्यन तुरूंगातून बाहेर येणार आहे. आर्यनच्या प्रतीक्षेत संपूर्ण खान कुटुंब आणि शाहरुखचे चाहते आहेत.  आर्यनच्या अटकेपासून शाहरुख खान मीडियापासून सतत दूर राहत होता. यादरम्यान त्याचा कोणताही फोटो समोर आला नव्हता, पण आज या फोटोवरून शाहरुखच्या आनंदाचा अंदाज लावता येतो.

आर्यनच्या सुटकेनंतर व्हायरल होत असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये शाहरुखसोबत वकिलांची संपूर्ण टीम दिसत आहे.  फोटोमध्ये सर्व दिग्गज वकील आहेत, ज्यांनी आर्यनची कोर्टात मांडण्यासाठी  प्रयत्न केला. जेव्हा आर्यन तुरूंगात होता तेव्हा  शाहरुख सोशल मीडिया आणि माध्यमांपासून दूर होता. 

सूत्रांनुसार, शाहरुख खानला कायदा आणि सुव्यवस्थेमुळे चिंतेत होता आणि ते टाळण्यासाठी त्याने मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. यावेळी तो त्याच्या सामान्य बीएमडब्ल्यू कार ऐवजी ह्युंदाई क्रेटा कार वापरत होता.