मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्रीला जेव्हा सासऱ्यांनी प्रॉपर्टीतून केलं होतं बेदखल...

अभिनेत्री वर्षा उसगावकर त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतात. पर्सनल आणि  प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री २८ फेब्रुवारीला तिचा वाढदिवस साजरा करणार आहे.वर्षा उसगावकरांनी मराठीशिवाय बॉलिवूडमध्येही अनेक सिनेमांत काम केलं आहे. आत्तापर्यंत त्यांनी बॉलिवूडच्या टॉप कलाकारांसोबत काम केलं आहे. अनेकदा ही अभिनेत्री तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आली आहे. अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही वर्षा उसगावकर अडकल्या आहेत.

Feb 27, 2024, 18:55 PM IST

मुंबई : अभिनेत्री वर्षा उसगावकर त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतात. पर्सनल आणि  प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री २८ फेब्रुवारीला तिचा वाढदिवस साजरा करणार आहे.वर्षा उसगावकरांनी मराठीशिवाय बॉलिवूडमध्येही अनेक सिनेमांत काम केलं आहे. आत्तापर्यंत त्यांनी बॉलिवूडच्या टॉप कलाकारांसोबत काम केलं आहे. अनेकदा ही अभिनेत्री तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आली आहे. अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही वर्षा उसगावकर अडकल्या आहेत.

1/7

अनेक कलाकारांसोबत केलंय काम

आत्तापर्यंत वर्षा यांनी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, अक्षय कुमार, ऋषी कपूर अशा अनेक कलाकारांसह स्क्रिन शेअर केली आहे.

2/7

खासगी आयुष्यामुळेही चर्चेत

करिअरशिवाय वर्षा त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आल्या आहेत. एका वादामुळेही त्या चर्चेत होत्या.

3/7

२००० साली बांधली लग्नगाठ

२००० साली वर्षा यांनी संगीत दिग्दर्शक रवि शंकर शर्मा यांचा मुलगा अजय शंकरशी लग्नगाठ बांधली.

4/7

प्रॉपर्टी हडपण्याचे गंभीर आरोप

वर्षा यांच्या नणंदेने छाया आणि वीणा यांनी तिच्यावर प्रॉपर्टी हडपण्याचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणावरुन खूप मोठा वादही निर्माण झाला होता. हे प्रकरण कोर्टात पोहचलं होतं.

5/7

प्रॉपर्टी मुलींच्या नावे केली

इतकंच नव्हेतर एका मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्रीचे सासरे रवी शंकर शर्मा यांनी त्यांची सगळी प्रॉपर्टी मुलींच्या नावे केली होती. 

6/7

कधीही मदत केली नसल्याचा आरोप

इतंकच नव्हेतर त्यांचा मुलगा अजय आणि सून वर्षा यांनी त्यांना कधीही मदत केली नसल्याचं रवी शंकर यांनी लिहिलं होतं.

7/7

प्रॉपर्टीतून बेदखल

रवी शंकर यांनी त्यांचा मुलगा आणि सूनेला त्यांच्या प्रॉपर्टीतून बेदखल केल्याचं बोललं जातं. त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यासाठीही त्यांना बोलवू नका, असंही रवी शंकर यांनी सांगितलं होतं.