'या' भारतातील ठिकाणी भारतीयांना प्रवेश नाही!

अशी काही ठिकाणी आहेत जिथे भारतीय जाऊ शकत नाहीत. यामागे अनेक कारणे आहेत. चला तुम्हाला या ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात. 

| Oct 25, 2024, 16:55 PM IST

Trvael: अशी काही ठिकाणी आहेत जिथे भारतीय जाऊ शकत नाहीत. यामागे अनेक कारणे आहेत. चला तुम्हाला या ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात. 

1/7

'या' भारतातील ठिकाणी भारतीयांना प्रवेश नाही!

2/7

Places Where Indians Are Restricted: भारतात फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. फिरायला आवडणारी लोक नवनवीन ठिकाणी जातात. पण अशी काही ठिकाणे आहेत जी फक्त भारतात आहेत. पण तिथे भारतीय जाऊ शकत नाहीत. यामागे सुरक्षा, वादग्रस्त ठिकाणे आणि इतर अनेक कारणे आहेत. अप्रतिम ठिकाणे असूनही, ती प्रवाशांसाठी बंद आहेत. चला तुम्हाला या ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात.   

3/7

उत्तर सेंटिनेल बेटे

उत्तर सेंटिनेल बेटे हे अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये स्थित आहेत. या ठिकाणी जगातील सर्वात जुनी आदिवासी जमात राहतात. आजही त्यांचा आजच्या युगाशी काहीही संबंध नाही आणि त्यांना बाहेरच्या लोकांशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीत. कोणीही जवळ आल्यास हे लोक हिंसक होऊन त्याची हत्या करतात. एवढेच नाही तर भारतीय लष्करालाही या ठिकाणी जाण्यास मनाई आहे.

4/7

अक्साई चिन, लडाख

लडाखमधील अक्साई चिन हे स्वर्गापेक्षा कमी नाही. तिथे  खारट मिठाचे तलाव, दरी आणि करकाश नदीचे सौंदर्य विलोभनीय आहे. पण भारतीय इथे जाऊ शकत नाहीत. कारण त्या जागेबद्दल बराच काळ झाला वाद सुरू आहे. भारत अक्साई चीनवर दावा करतो आणि तो लडाखचा भाग आहे असे सांगतो. १९६२ च्या युद्धात चीनने अक्साई चीनचा काही भाग ताब्यात घेतला होता.

5/7

बॅरेन बेट, अंदमान

बॅरेन बेट हे अंदमान समुद्रात आहे आणि भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखीचे घर आहे. या बेटाचे सौंदर्य जहाजातून दुरूनच पाहता येते. कारण इथे जाण्यास मनाई आहे.

6/7

लक्षद्वीपची काही बेटे

लक्षद्वीपमध्ये 36 बेटे आहेत, ज्यातील बहुतेक बेटांवर पर्यटकांना जाण्यास मनाई आहे. याचे कारण स्थानिक स्वारस्य आणि नौदलाचा बेस देखील आहे. परंतु तुम्ही आगत्ती, बंगाराम, कदम, कावरत्ती आणि मिनिकॉय बेटांसारख्या काही बेटांना भेट देऊ शकतात.

7/7

बीएआरसी, मुंबई

मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) हे पर्यटकांसाठी प्रतिबंधित क्षेत्र आहे. हे भारताचे प्रतिष्ठित अणु संशोधन केंद्र आहे. सुरक्षेच्या कारणास्तव संशोधक आणि विद्यार्थ्यांशिवाय अभ्यागत प्रवेश करू शकत नाहीत. संशोधक आणि विद्यार्थ्यांनाही विविध प्रकारच्या परवानग्या मिळाल्यानंतरच त्यात प्रवेश दिला जातो.