कटप्पाने बाहुबलीला मारण्याचं कारण फक्त या तिघानांच माहित आहे.

कटप्पाने बाहुबलीला का मारलं? ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त तीन लोक अचूक देणार आहेत.

Updated: Sep 1, 2016, 11:10 AM IST
कटप्पाने बाहुबलीला मारण्याचं कारण फक्त या तिघानांच माहित आहे. title=

मुंबई: कटप्पाने बाहुबलीला का मारलं? ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त तीन लोक अचूक देणार आहेत.

2015 चा सुपरहिट सिनेमा बाहुबली ने प्रत्येक चाहत्याच्या मनात एक प्रश्न उभा केला आहे. कटप्पाने बाहुबलीला का मारलं? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक व्यक्ती सोशल साइट्सवर आपल्या पध्दतीने देत आहेत.

हा सिनेमा पाहून निर्माण झालेल्या प्रश्नाचं खरं उत्तर आता बाहुबली सिक्वलमध्ये चाहत्यांना मिळणार आहे.

सध्यातरी तरी कटप्पा ने बाहुबली को क्यॅु मारा? या प्रश्नाचं उत्तर सिनेमाचे दिग्दर्शक एस.एस.राजमौली, स्क्रिप्ट लेखक के.वी.विजेंद्रप्रसाद आणि अभिनेता प्रभास याशिवाय कोणालाचं माहीत नाही.