पावसाळा आला तरी पीक कर्ज मिळेना

...

Updated: Jun 17, 2018, 09:48 AM IST
पावसाळा आला तरी पीक कर्ज मिळेना  title=

औरंगाबाद : पावसाळा सुरु झाला असताना अजूनही शेतकऱ्यांना पिककर्ज मिळत नाहीये मात्र, प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे, मुख्यमंत्री परत आल्यावर निर्णय घेवू असं राज्याचे अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार औरंगाबादमध्ये म्हटलयं.

कर्ज मिळण्याच्या अडचणीबाबत केंद्र सरकारला बोललो, महसुलमंत्री सुद्दा बैठका घेत आहेत, कर्ज वाटप हळू सुरु असल्याचंही ते म्हणाले. मात्र, याबाबत तोडगा मुख्यमंत्री परदेशातून आल्यावर निघेल म्हणजे तोपर्यंत काय शेतकऱ्यांनी वाट पहावी का? असा प्रश्न पडतोय.