Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, थेट महाविकास आघाडीला विचारला कडवट सवाल

 शिवसेना नेते व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालंय.

Updated: Jun 24, 2022, 05:44 PM IST
Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, थेट महाविकास आघाडीला विचारला कडवट सवाल title=

मुंबई : शिवसेना नेते व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालंय.शिवसेनेचे अनेक आमदार शिंदेंच्या गोटात दाखल झाल्याने महाविकास आघाडी सरकार पडतं की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. या सर्व राजकीय घडामोडींची गल्लीपासून दिल्लीत चर्चा आहे. सोशल मीडियावर देखील या एकाच विषयावर चर्चा सुरु आहे. त्यात आता एका प्रसिद्घ अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. तिचीही पोस्ट ही सध्या चर्चेत आली आहे.   

मराठी चित्रपटसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी विविध राजकीय मुद्यांवर सोशल मीडियावर नेहमीच बिनधास्तपणे बोलत असते. मग तो ब्राचा विषय असो की राजकीय या सर्व विषयावर ती बोलत असते. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर देखील तिने आता एक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने शिवसेनेला सवाल केला आहे. तिच्या या पोस्टवर खुप प्रतिक्रिया येत आहेत.  

<

हेमांगी कवी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. हेमांगीने नुकतंच राज्यातील राजकारणात घडत असलेल्या घडामोडींवर भाष्य केले आहे. हेमांगीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?’, असे हेमांगीने म्हटले आहे.तिच्या या पोस्टवरुन अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. तर काहींनी खुप चांगल्या कमेंट केल्या आहेत. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.