स्वानंदीनंतर आता 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेता पुष्कराज अडकणार लग्न बंधनात?

Pushkaraj Chirputkar on Wedding : 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम स्वानंदी टिकेकरनंतर आता पुष्कराज अडकणार लग्न बंधनात? अभिनेत्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पुष्कराजनं यावर वक्तव्य केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 13, 2023, 05:34 PM IST
स्वानंदीनंतर आता 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेता पुष्कराज अडकणार लग्न बंधनात?  title=
(Photo Credit : Social Media)

Pushkaraj Chirputkar on Wedding : छोट्या पडद्यावरील 'दिल दोस्ती दुनियादारी' ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या मालिकेतील सगळेच कलाकार प्रेक्षकांच्या मनात आहेत. ती मालिका पाहिल्यानंतर अनेकांनी मैत्रिचा खरा अर्थ कळाला. या मालिकेतील अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने नुकताच तिचा साखरपुडा उरकला आहे. आता चर्चा आहे ती याच मालिकेतील अभिनेता पुष्कराज देखील लग्न बंधनात अडकणार आहे. 

पुष्कराजविषयी बोलायचे झाले तर त्यानं 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेत आशुतोष शिवलकर ही भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका सगळ्यांच्या पसंतीस उतरली होती. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पुष्कराजनं त्याच्या लग्नावर वक्तव्य केलं आहे. स्वानंदीचा साखरपुडा झाल्यानंतर आता पुष्कराज लग्नाच्या बेडीत अडकणार या चर्चा सुरु होत्या हे पाहता आता पुष्कराज म्हणाला, 'लग्नाबाबत सध्या माझा काहीही विचार नाही. नवरा व्हायच आहे की नाही हे कळत नाहीये.  किरकोळ मी कधीही असतोच. कोणाच्याही आयुष्यात गेलो तरी मी किरकोळ असतोच हे मी मान्य केलं आहे. त्यामुळे नवरा झालो तरी मी किरकोळच होणार यात काही शंका नाही.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुष्कराजनं त्याला स्वत:ला किरकोळ का म्हटलं असा सवाल अनेकांना पडला असेलच. तर ते पुष्कराज त्याच्या नाटकाचं प्रमोशन करत म्हटला आहे. पुष्करचं नवं नाटक येत असून किरकोळ नवरे हे नवंकोरं असं त्याचं नाव आहे. या नाटकात पुष्कराजसोबत अभिनेत्री अनिता दातेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'जाहीर इशारा देतोय, ऐकलं नाही तर...'; सीमा हैदरच्या चित्रपटावरून मनसे आक्रमक

पुष्कराजच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 2011 साली प्रदर्शित झालेल्या आजोबाा वयात आले या चित्रपटातून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर पुष्कराजनं मागे वळून पाहिलं नाही. तो ‘टीटीएमएम’, ‘मुंबई डायरीज’ 26/11, ‘मी वसंतराव’ या चित्रपटांमध्ये देखील दिसला होता. त्याच्या करिअरमध्ये 'दिल दोस्ती दुनियादारी' ही मालिका खूप महत्त्वाची ठरली कारण याच मालिकेमुळे त्याला खरी ओळख मिळाली होती. त्यानंतर याच मालिकेचा सिक्वेल असणारी दिल दोस्ती दोबारामधून तो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र हा सिक्वेल प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस उतरला नाही. पुष्कराज अभिनेत्यासोबतचं एक उत्तम सुत्रसंचालक देखील आहे.