भारतीय रेल्वे शिवाजी महाराजांना विसरली?

भारतीय रेल्वे शिवाजी महाराजांना विसरली की काय असा प्रश्न निर्माण होणारं उदाहरण समोर आलं आहे. 

Updated: Jan 5, 2016, 08:49 AM IST
भारतीय रेल्वे शिवाजी महाराजांना विसरली? title=

मुंबई : भारतीय रेल्वे शिवाजी महाराजांना विसरली की काय असा प्रश्न निर्माण होणारं उदाहरण समोर आलं आहे. 

२०१६ या कॅलेंडरमध्ये शिवाजी महाराजांच्या जयंतीची सुट्टी द्यायलाच रेल्वेचा मुंबई विभाग विसरला आहे. 

वर्षातल्या 12 दिवसांच्या सुट्यांच्या यादीत दरवर्षी १९ फेब्रुवारीला मिळणारी शिवजयंतीची सुटी यावर्षी देण्यात आलेली नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.