घटस्फोटानंतर पहिल्यांदाच शशांक केतकरचा मोठा खुलासा

काय म्हणाला श्री?

घटस्फोटानंतर पहिल्यांदाच शशांक केतकरचा मोठा खुलासा  title=

मुंबई : मराठी मालिकांमध्ये एखादी जोडी लोकप्रिय होते तेव्हा प्रेक्षकांना मनापासून वाटत असतं या कलाकारांनी खऱ्या आयुष्यातही एकमेकांचा विचार करावा. पण असं खूपच कमी वेळेला होतं. पण पडद्यावरील एक लोकप्रिय जोडी जेव्हा खऱ्या आयुष्यातही एकमेकांचा विचार करते तेव्हा प्रेक्षकांचा आनंदाला पारावा उरत नाही. असंच काहीसं झालं होतं 'होणार सून मी या घरची' या मालिकेतील श्री - जान्हवी म्हणजे शशांक केतकर आणि तेजश्री प्रधानबद्दल.  मंदार देवस्थळी दिग्दर्शित या मालिकेतून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आणि अगदी तात्काळ एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या या जोडी खऱ्या आयुष्यातही लग्न करण्याचा निर्णय घेतला. श्री आणि जान्हवी यांच लग्न हे प्रेक्षकांना सुखावणार होतं. पण प्रेक्षकांचा हा आनंद फार वेळ काही टिकला नाही. अगदी एका वर्षातच या दोघांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली. 

काय म्हणाला शशांक केतकर?

''होणार सून" आणि श्री - जान्हवीच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला. एका मालिकेतून समोर आलेली ही जोडी खऱ्या आयुष्यात असा निर्णय घेईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. पुणे कौटुंबिक न्यायालयात या दोघांना घटस्फोट घेतला. मात्र आजही या दोघांची मालिका आणि जोडी प्रेक्षक मिस करतात. असं असताना या दोघांनीही कधी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणताच खुलासा केला नाही. मात्र काही महिन्यांपूर्वी RJ Shonali च्या कार्यक्रमात तेजश्रीने आपल्या सिनेमाच्या प्रमोशनला आलेली असताना चाहत्यांना उत्तर दिलं. असं झाल्यावर आता पहिल्यांदाच श्री म्हणजे महाराष्ट्राचा लाडका शशांक केतकरने याबाबत RJ Shonali च्याच कार्यक्रमात मोठा खुलासा केला आहे. हे पण वाचा : तेजश्री प्रधान आपल्या Ex नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल काय म्हणाली?

 

केला खूप मोठा खुलासा ?

एक सुंदर नातं अगदी एका वर्षातच संपवण्याचा या दोघांनी का निर्णय घेतला याबाबत शशांक खूप मोकळेपणाने या कार्यक्रमात बोलला आहे. तसेच तेजू आणि त्याच्या नात्याबद्दलही त्याने सांगितले आहे. तसेच या कार्यक्रमात आम्ही कलाकार हे Public Figure आहोत Public Property नाहीत याचा प्रेक्षकांनी विचार करावा असा खोचक सल्ला देखील दिला आहे. काय म्हणाला शशांक ऐका तुम्हीच.... 

शशांकच्या अगोदर याच कार्यक्रमात तेजश्रीने देखील आपली मत मांडली होती. कलाकारावर जेव्हा प्रेक्षक भरभरून प्रेम करतात त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचण्यात मदत करतात तेव्हा कलाकारांनी देखील थोडं विचार करून वागावं अशी प्रतिक्रिया तेजश्रीने कार्यक्रमात मिळत होती. आणि त्यावेळी तिने आपली मतं खूप मोकळेपणाने मांडली होती. घटस्फोटानंतर तेजश्रीने अद्याप दुसऱ्या लग्नाचा विचार केलेला नाही. मात्र श्री म्हणजे शशांक केतकरने आपली जुनी मैत्रिण वकिल प्रियंका ढवळेशी नुकतंच लग्न केलं आहे.