वजन कमी करायचंय? मग 4 फळ अजिबात खाऊ नका

Pooja Pawar
Feb 02,2025


वजन वाढीच्या समस्येने अनेक लोक सध्या त्रस्त आहेत. वजन कमी करताना अनेकजण आहारात फळांचा समावेश करतात परंतु काही फळांच्या सेवनाने तुमचे वजन वाढू शकते.


वजन कमी करताना आहारात कोणत्या फळांचे सेवन करणे टाळावे याविषयी जाणून घेऊयात.

एवोकाडो :

100 ग्रॅम एवोकाडो या फळामध्ये 160 कॅलरीज असतात. एवोकॅडो हा हेल्दी फॅट्सचा चांगला स्रोत असला तरी तो जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमचे वजन वाढू शकते.

नारळाची मलाई :

नारळ पाणी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. परंतु प्रमाणापेक्षा अधिक मलाईचे सेवन केल्यास वजन वाढू शकते, कारण यात कॅलरीज, कार्बोहाइड्रेटचे प्रमाण जास्त असते.

केळ :

एका केळ्यामध्ये जवळपास 150 कॅलरीज असतात आणि जवळपास 37.5 ग्रॅम कार्बोहाइड्रेट असतात. यात प्रमाणापेक्षा जास्त साखर असते. जर तुम्ही दिवसातून दोन ते तीन केळी खाल्लीत तर वजन वाढू शकते. त्यामुळे दिवसातून केवळ एक केळं खाणे चांगलं ठरतं.

आंबा आणि अननस :

आंबा आणि अननस या दोन्ही फळांमध्ये कॅलरीज जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे वेट लॉस करताना या फळांचे सेवन न करणे फायदेशीर ठरते, अन्यथा वजन वाढू शकते.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story