पृथ्वीवर बहुतांश भाग हा पाण्यानं व्यापला असला तरीही यापैकी फक्त 3 टक्के पाणीच पिण्यायोग्य आहे.
पाणी ही प्रत्येक सजीवाची गरज असून, या पाण्याच्या बळावर जीवसृष्टीसुद्धा जग धरते.
दर दिवशी एका व्यक्तीला किमान 3 ते 4 लीटर पाण्याची गरज भासते. पण, तुम्ही ज्या बाटलीतून पाणी पिताय ती बाटली नेमकी कधी बदलायची हे माहितीये?
पाण्याची बाटली प्लास्टिकची असल्यास ती 3 ते 6 महिन्यांनी बदलावी.
स्टेनलेस स्टीलची बाटली 2 वर्षांनी बदलावी. प्लास्टीकच्या तुलनेत ती अधिक काळ टीकते.
काचेच्या बाटल्या स्टीलपेक्षाही अधिक काळ टीकतात. तरीही त्या 2 ते 3 वर्षांत बदलाव्यात.
पाण्याची बाटली कोणतीही असो पण ती दररोज स्वच्छ धुणं गरजेचं असतं. अन्यथा त्यात बुरशी किंवा बॅक्टेरिया वाढू लागतात.