जगातील सर्वात धोकादायक बेट भारतात, जो इथे गेला तो...

Soneshwar Patil
Aug 01,2024


जगभरात अनेक बेटे आहेत. जिथे प्रत्येकाला भेट द्यायची असते. पण अशीही अनेक बेटे आहेत जिथे कोणी गेला तर परत येत नाही.


भारतातील हे सर्वात धोकादायक बेट असून ते अनेक रहस्यांनी वेढलेले आहे.


अंदमान निकोबारचा हे बेट एक भाग आहे. याचे नाव नॉर्थ सेंटिनेल बेट असं आहे.


येथे भेट देण्यास भारत सरकारने कठोर नियम लागू केले आहेत. कारण या बेटावर राहणाऱ्या प्रजातींना बाहेरील लोकांचा हस्तक्षेप आवडत नाही.


येथे बाहेरील लोकांच्या प्रवेशावर सेंटिनेलीज लोक तीक्ष्ण बाणांचा वर्षाव करतात. ज्यामध्ये व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.


येथील आदिवासी अनेक वर्षांपासून बाहेरच्या व्यक्तीशी संपर्कात नाहीत. बऱ्याच लोकांनी या बेटाला भेट देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यांचे वाईट परिणाम झाले आहेत.

VIEW ALL

Read Next Story