स्वामी समर्थांवर आणखी एक चित्रपट; दिग्दर्शकानं सांगितलं यात वेगळं काय?

Movie On Swami Samarth : स्वामी समर्थांवर आणखी एक नवा चित्रपट कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला...

दिक्षा पाटील | Updated: Feb 27, 2025, 06:55 PM IST
स्वामी समर्थांवर आणखी एक चित्रपट; दिग्दर्शकानं सांगितलं यात वेगळं काय?
(Photo Credit : Social Media)

Movie On Swami Samarth : स्वामी समर्थांच्या आख्यायिका आपण नेहमची ऐकत असतो. नेहमीच त्यांच्या अस्तित्वाच्या प्रेरणादायी गाथा आपण पाहिल्या आहेत. आता नव्या युगातील स्वामी समर्थांच्या अस्तित्वाची प्रेरणादायी गाथा सांगणारा ‘मी पाठीशी आहे’ हा चित्रपट येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्माचा अनोखा संगम प्रेक्षकांना अनुभव्हायला मिळणार आहे. पण या आधी देखील अनेक चित्रपट आहेत जे स्वामी समर्थांवर प्रदर्शित झाले आहेत. आता या चित्रपटात काय वेगळं पाहायला मिळणार यावरून चर्चा सुरु असताना दिग्दर्शक पराग अनिल सावंत यांनी सांगितलं आहे. 

दिग्दर्शक पराग अनिल सावंत म्हणतात, "मी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की, हा चित्रपट कोणीही बनवत नसून हा चित्रपट स्वतःहून घडला आहे. स्वामींनी तो आमच्याकडून घडवून घेतला आहे. आम्ही सगळे निमित्तमात्र आहोत. ‘मी पाठीशी आहे’ हा चित्रपट अनेक श्रद्धावान व्यक्तीच्या आयुष्यातील प्रेरणादायी अनुभवाचा प्रवास आहे. स्वामी समर्थांनी प्रत्येकाला दिलेला आधार, त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती यावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करून नक्कीच सकारात्मक ऊर्जा देईल. आम्हाला खात्री आहे की, हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल."

येत्या 28 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ऑफबीट प्रॉडक्शन, नित्य सेवा प्रॉडक्शन आणि वेरा प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे कथा, संकलन आणि दिग्दर्शन पराग अनिल सावंत यांनी केले आहे. तर मयूर अर्जुन खरात, लक्ष्मीकांत गजानन कांबळे, ॲड. शुभांगी किशोर सोनवले, प्रमोद नंदकुमार मांडरे, शितल सोनावणे, ऋतुजा नरेंद्र कदम, अनिल गावंड आणि केतन कल्याणकर या स्वामींच्या सेवेकरांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. 

हेही वाचा : 'मी मुंबई किंवा भारतात पोहत नाही'; सोनाक्षी सिन्हाने सांगितलं कारण, 'मला भितीये की माझा...'

या चित्रपटाची पटकथा ही संजय नवगिरे, दिलीप परांजपे यांनी लिहिली आहे. तर संजय नवगिरे यांनी चित्रपटाचे संवादही लिहिले आहेत. तर चित्रपटातील गाणी ही कबीर शाक्य संगीतबद्ध केली आहेत. या चित्रपटात सक्षम कुलकर्णी, सतीश पुळेकर, अरुण नलावडे, सुहास परांजपे, वर्षा प्रभु, श्रीकांत पाटील, अश्विनी चवरे, प्रसाद सुर्वे, शितल सोनावणे, सूचित जाधव, श्रद्धा महाजन, राजवीर गायकवाड, वैष्णवी पोटे यांच्या प्रमुख भूमिका असून माधुरी पवार, संदेश जाधव आणि नूतन जयंत हे विशेष पाहुणे म्हणून झळकणार आहेत.